शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सोयाबीनचे बियाणे निघाले बोगस; शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

बोरगाव मंजू येथील गोपाल पंडितराव देशमुख, प्रमोद शंकरराव शेवतकार, संतोष भीमराव देशमुख, दशरथ मोहोड या चार शेतकऱ्यांनी पिंजर पोलिसात ...

बोरगाव मंजू येथील गोपाल पंडितराव देशमुख, प्रमोद शंकरराव शेवतकार, संतोष भीमराव देशमुख, दशरथ मोहोड या चार शेतकऱ्यांनी पिंजर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, राहित येथील सुरेश राजाराम सपकाळ याने दिनांक २६ जून रोजी प्रतिबॅग २,७०० रुपये याप्रमाणे ३६ बॅग सोयाबीनचे बियाणे बोरगाव मंजू येथील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विकले. बोरगाव मंजू येथील चारही शेतकऱ्यांनी ३६ बॅगांपैकी २४ बॅगेतील बियाण्याची पेरणी केली. बियाणे बोगस असल्याने उगवलेच नाही. त्यामुळे बोरगाव मंजू येथील शेतकऱ्यांनी सुरेश राजाराम सपकाळ (रा. बार्शीटाकळी, हल्ली मुक्काम राहित) यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली. सुरेश सपकाळ यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे चारही शेतकऱ्यांनी पिंजर पोलीस स्टेशन गाठत सुरेश राजाराम सपकाळ यांच्याविरूद्ध तक्रार दिली. चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

--------------------

शेतकऱ्यांनी बियाणे नेले. मात्र, पावसाचा खंड पडल्याने किंवा जोराने पाऊस आल्याने बियाणे उगवले नसेल. बोरगाव मंजू येथील शेतकऱ्यांनी केलेला आरोप खोटा आहे.

- सुरेश राजाराम सपकाळ, (रा. बार्शीटाकळी, हमु. राहित)

-----------------------

बोरगाव मंजू येथील चार शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. कृषितज्ज्ञांचा सल्ला घेऊन चौकशी करणार आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

-महादेवराव पडघान, ठाणेदार, पोलीस स्टेशन पिंजर.