शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे उत्पादन घटणार!

By admin | Updated: September 2, 2016 00:56 IST

पावसाने दडी मारल्याने सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अकोला, दि. १ : यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्याने सर्वच पिकांची जोमदार वाढ झाली आहे. सोयाबीन पिकाची अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली; पण पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने शेंगांचे प्रमाण हवे त्या प्रमाणात नसल्याने यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यावर्षी वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने पेरण्यांना हा पाऊस पोषक ठरला. जुलै-ऑगस्ट महिन्यातच पावसाने जवळपास सरासरी गाठली. पिकांची वाढही जोमदार झाली; पण ऐन पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आली असताना पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांवर दुष्परिणाम होत असून, सोयाबीनचे पीक अनेक ठिकाणी पिवळे पडले आहे.पश्‍चिम विदर्भातील ३२ लाख हेक्टरपैकी साडेचौदा लाख हेक्टरवर यावर्षी सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे पीक ७0 टक्के शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. ज्या शेतकर्‍यांनी १0 जुलैनंतर पेरणी केली तेथे हे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. शेंगा धरण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारली आहे. परिणामी, सोयाबीनच्या दाण्याचा आकार कमी राहण्याची शक्यता आहे. हलक्या जमिनीतील सोयाबीनवर अधिक परिणाम होऊ शकतो, तर भारी, काळ्य़ा जमिनीतील शेंगांवर या तुलनेत कमी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील तीन, चार वर्षांनंतर यावर्षी सोयाबीन पीक जोमदार वाढल्याने शेतकरी आनंदित आहे; पण पाऊस त्यांच्या आनंदावर विरजण टाकतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मागील दहा वर्षात २00७ मध्ये सोयाबीन पीक बर्‍यापैकी होते, त्यानंतर २0१३ मध्ये या पिकाने शेतकर्‍यांना दिलासा दिला; पण ही दोन वर्षे सोडली तर मात्र सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आली.- सोयाबीन परिपक्वतेच्या अवस्थेत असताना नेमकी पावसाने दडी मारल्याने पिकावर पाण्याचा ताण पडला.परिणामी, बरड शेतातील शेंगाचे प्रमाण कमी झाले.- डॉ. मोहन खाकरे ,ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ,डॉ. पंदेकृवि,अकोला.