शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम संपल्यानंतर सोयाबीनचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:17 IST

वऱ्हाडात सोयाबीन हे पीक प्रामुख्याने घेण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन लाख हेक्टरवर पेरणी केली. हे सोयाबीन अति पावसाने ...

वऱ्हाडात सोयाबीन हे पीक प्रामुख्याने घेण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन लाख हेक्टरवर पेरणी केली. हे सोयाबीन अति पावसाने बहुतांश भागात खराब झाले. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. थोडेफार वाचलेले सोयाबीन बाजारात आणले. खुल्या बाजारातही तीन हजार रुपये दराने सोयाबीन विकावे लागले. जिल्ह्यातील बाजार समितीतही दरात घट पाहायला मिळाली. मालाचा दर्जा निकृष्ट असल्याने अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी दराने सोयाबीन विकले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अकोला बाजार समितीत सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. अकोला बाजार समितीत दैनंदिन सोयाबीनची अडीच हजार क्विंटलपेक्षा अधिक खरेदी होत आहे. कमीत कमी ४८०० तर जास्तीत जास्त ५२७५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. ऐन हंगाम संपल्यानंतर हा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते. आता काहीच शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे. तर काहींनी खरीप हंगामाच्या बियाण्यांसाठी साठवून ठेवले आहे. घरात शेतमाल असताना भाव गडगडतात, तर शेतमाल विकल्यानंतर भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे न सुटणारे कोडे बनले आहे.

--बॉक्स--

बाजार समितीत भाव

कमीत कमी ४८०० रुपये

जास्तीत जास्त ५२७५ रुपये

शनिवारी झालेली आवक

२६७९ क्विंटल

--कोट--

खरिपात सोयाबीनचे पीक खराब झाले. उताराही कमी आला. लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. आता सोयाबीनचे भाव वाढत असल्याने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे वाटत आहे.

-गौरव घोगरे, शेतकरी, टाकळी