शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

इराण-इराकमधून मागणी बंद; सोयाबीनचे भाव चारशे रुपयांनी घसरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 15:27 IST

फेब्रुवारीपर्यंत इराण-इराक मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी भारताकडून करीत होते; मात्र २६ फेब्रुवारीनंतर हा तणाव अधिक वाढला. त्यामुळे सोयाबीनची खरेदी तूर्त थांबली आहे. सोयाबीनचे भाव प्रती क्विटंल चारशे रुपयांनी गडगडले आहे.

- संजय खांडेकरअकोला:भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे इराण-इराकने भारतातून येणाऱ्या सोयाबीनवर प्रतिबंध घातला आहे. फेब्रुवारीपर्यंत इराण-इराक मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी भारताकडून करीत होते; मात्र २६ फेब्रुवारीनंतर हा तणाव अधिक वाढला. त्यामुळे सोयाबीनची खरेदी तूर्त थांबली आहे. सोयाबीनचे भाव प्रती क्विटंल चारशे रुपयांनी गडगडले आहे. सोयाबीनला अधिक चांगले भाव मिळण्याची अपेक्षा असताना अचानकसोयाबीनचे भाव कोसळल्याने देशभरातील कास्तकारांना कोट्यवधींचा आर्थिक फटका सोसावा लागत आहे.फेब्रुवारी महिन्याच्या २० तारखेपर्यंत सोयाबीनला ३९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत होते. आगामी काही दिवसांत ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची आस कास्तकारांना लागली होती. त्यामुळे अनेकांनी सोयाबीन बाजारात आणले नव्हते. ही परिस्थिती असताना अचानक सोयाबीनच्या भावात घसरण सुरू झाली. सोयाबीनचे भाव ३५०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन थांबल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. तब्बल चारशे रुपयांनी सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही सोयाबीनचा साठा आहे, त्या कास्तकारांनी आता मिळेल त्या भावात सोयाबीन काढण्यास सुरुवात केली आहे.‘एनसीडीईएक्स’कडे १३७७९४ टन साठानॅशनल कॉमोडिटी अ‍ॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेडकडे देशभरातील गोदामांमध्ये १३७७९४ साठा आहे. अकोला- ४९१५७, इंदूर- १९८७५, कोटा-१८१०८, लातूर -५३७, मंदसौर-११७१७, नागपूर-४०१, सागर २३३८, शुजालपूर-१४८०११, आणि विशादा २०८५० असा एकूण १३७७९४ टन साठा पडून आहे. सोयाबीनचे भाव वाढतील म्हणून हा साठा करण्यात आला होता; मात्र या साठ्यांमुळे आता कोट्यवधींचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे. 

भारत-पाकिस्तानमध्ये गत काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्यामुळे इराण-इराकने भारतातील सोयाबीनची खरेदी थांबविली. भारतात सोयाबीनला फारशी मागणी नाही. मार्चअखेर आर्थिक वर्ष असल्याने व्यापारी वर्ग सोयाबीन खरेदीच्या मन:स्थितीत नाही. परिणामी, सोयाबीनचे भाव पडले आहे.-वसंत बाछुका, उद्योजक अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार