शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

सोयाबीनची आवक वाढली; भाव घसरले!

By admin | Updated: October 22, 2015 01:50 IST

शेतक-यांचा हिरमोड; गाठीशी पैसा उरत नसल्याची खंत.

अतुल जयस्वाल /अकोला : निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी सोयाबीनसह खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले आहे. घरात आलेले सोयाबीन सणा-सुदीचे दिवस तोंडावर आल्यामुळे शेतकर्‍यांनी विक्रीसाठी काढले असून, बाजारपेठेत आवक वाढताच दरही झपाट्याने खाली उतरत आहेत. नाइलाजाने मिळेल त्या दरातही सोयाबीनची विक्री करावी लागत असल्यामुळे शेतकर्‍यांचा हिरमोड होत असून, सोयाबीनच्या विक्रीतून गाठीशी पैसा शिल्लक उरत नसल्याची खंत ते व्यक्त करीत आहेत. गत दोन ते तीन वर्षांपासून निसर्ग सातत्याने शेतकर्‍यांची परीक्षा घेत आहे. कधी अतवृष्टी, तर कधी अवर्षण यामुळे गत तीन वर्षांपासून खरीप हंगाम शेतकर्‍यांना हुलकावणी देत आहे. यावर्षी जिल्ह्यात २ लाख २९ हजार ९६0 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी सोयाबीनची लागवड केली. सुरवातीपासूनच पावसाने दगा दिल्यामुळे सोयाबीनसह खरिपातील सर्वच पिकांची परिस्थिती जेमतेम राहिली. मूग, उडीद हातचे गेल्याने शेतकर्‍यांना सोयाबीनपासून अपेक्षा आहे; परंतु यावर्षी सोयाबीनच्या उतार्‍यात प्रचंड घट येत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा येत आहे. दसरा व दिवाळी हे सण तोंडावर आले असताना शेतकरी त्यांचा माल अकोला येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सोयाबीनला या मोसमातील सर्वोच्च ३९५0 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे हुरूप वाढलेल्या शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात माल विक्रीसाठी काढला आहे. या महिन्यात ५00 क्विंटलपासून सुरू झालेली सोयाबीनची आवक १0 हजार क्विंटलच्या घरात पोहोचली आहे. चालू महिन्यात आतापर्यंत ६0 ते ६२ हजार क्विंटल सोयाबीन बाजार समितीत आल्याची माहिती अधिकार्‍यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.