शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची आवक वाढली; भाव घसरले!

By admin | Updated: October 22, 2015 01:50 IST

शेतक-यांचा हिरमोड; गाठीशी पैसा उरत नसल्याची खंत.

अतुल जयस्वाल /अकोला : निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी सोयाबीनसह खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले आहे. घरात आलेले सोयाबीन सणा-सुदीचे दिवस तोंडावर आल्यामुळे शेतकर्‍यांनी विक्रीसाठी काढले असून, बाजारपेठेत आवक वाढताच दरही झपाट्याने खाली उतरत आहेत. नाइलाजाने मिळेल त्या दरातही सोयाबीनची विक्री करावी लागत असल्यामुळे शेतकर्‍यांचा हिरमोड होत असून, सोयाबीनच्या विक्रीतून गाठीशी पैसा शिल्लक उरत नसल्याची खंत ते व्यक्त करीत आहेत. गत दोन ते तीन वर्षांपासून निसर्ग सातत्याने शेतकर्‍यांची परीक्षा घेत आहे. कधी अतवृष्टी, तर कधी अवर्षण यामुळे गत तीन वर्षांपासून खरीप हंगाम शेतकर्‍यांना हुलकावणी देत आहे. यावर्षी जिल्ह्यात २ लाख २९ हजार ९६0 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी सोयाबीनची लागवड केली. सुरवातीपासूनच पावसाने दगा दिल्यामुळे सोयाबीनसह खरिपातील सर्वच पिकांची परिस्थिती जेमतेम राहिली. मूग, उडीद हातचे गेल्याने शेतकर्‍यांना सोयाबीनपासून अपेक्षा आहे; परंतु यावर्षी सोयाबीनच्या उतार्‍यात प्रचंड घट येत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा येत आहे. दसरा व दिवाळी हे सण तोंडावर आले असताना शेतकरी त्यांचा माल अकोला येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सोयाबीनला या मोसमातील सर्वोच्च ३९५0 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे हुरूप वाढलेल्या शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात माल विक्रीसाठी काढला आहे. या महिन्यात ५00 क्विंटलपासून सुरू झालेली सोयाबीनची आवक १0 हजार क्विंटलच्या घरात पोहोचली आहे. चालू महिन्यात आतापर्यंत ६0 ते ६२ हजार क्विंटल सोयाबीन बाजार समितीत आल्याची माहिती अधिकार्‍यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.