शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सोयाबीनची आवक वाढली; भाव घसरले!

By admin | Updated: October 22, 2015 01:50 IST

शेतक-यांचा हिरमोड; गाठीशी पैसा उरत नसल्याची खंत.

अतुल जयस्वाल /अकोला : निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी सोयाबीनसह खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले आहे. घरात आलेले सोयाबीन सणा-सुदीचे दिवस तोंडावर आल्यामुळे शेतकर्‍यांनी विक्रीसाठी काढले असून, बाजारपेठेत आवक वाढताच दरही झपाट्याने खाली उतरत आहेत. नाइलाजाने मिळेल त्या दरातही सोयाबीनची विक्री करावी लागत असल्यामुळे शेतकर्‍यांचा हिरमोड होत असून, सोयाबीनच्या विक्रीतून गाठीशी पैसा शिल्लक उरत नसल्याची खंत ते व्यक्त करीत आहेत. गत दोन ते तीन वर्षांपासून निसर्ग सातत्याने शेतकर्‍यांची परीक्षा घेत आहे. कधी अतवृष्टी, तर कधी अवर्षण यामुळे गत तीन वर्षांपासून खरीप हंगाम शेतकर्‍यांना हुलकावणी देत आहे. यावर्षी जिल्ह्यात २ लाख २९ हजार ९६0 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी सोयाबीनची लागवड केली. सुरवातीपासूनच पावसाने दगा दिल्यामुळे सोयाबीनसह खरिपातील सर्वच पिकांची परिस्थिती जेमतेम राहिली. मूग, उडीद हातचे गेल्याने शेतकर्‍यांना सोयाबीनपासून अपेक्षा आहे; परंतु यावर्षी सोयाबीनच्या उतार्‍यात प्रचंड घट येत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा येत आहे. दसरा व दिवाळी हे सण तोंडावर आले असताना शेतकरी त्यांचा माल अकोला येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सोयाबीनला या मोसमातील सर्वोच्च ३९५0 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे हुरूप वाढलेल्या शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात माल विक्रीसाठी काढला आहे. या महिन्यात ५00 क्विंटलपासून सुरू झालेली सोयाबीनची आवक १0 हजार क्विंटलच्या घरात पोहोचली आहे. चालू महिन्यात आतापर्यंत ६0 ते ६२ हजार क्विंटल सोयाबीन बाजार समितीत आल्याची माहिती अधिकार्‍यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.