शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सोयाबीनचे पीक करपले !

By admin | Updated: September 14, 2016 02:02 IST

अकोला जिल्हय़ातील शेतक-यांच्या हरित स्वप्नावर फेरले पाणी.

अकोला, दि. १३ : पाच आठवडे झाले पावसाने दडी मारल्याने जिल्हय़ातील सोयाबीनचे पीक करपले असून, सतत पाच वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांच्या हरित स्वप्नावर यावर्षी पाणी फिरले आहे. सोयाबीनच्या शेंगा परिपक्वतेच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारली आहे. त्याचा परिणाम शेंगावर झाला आहे.खरीप हंगामातील पिके परिपक्वतेच्या अवस्थेत असतानाच पावसाने प्रदीर्घ दडी मारली. पाण्याचा ताण पडल्याने पिके करपत असून, खरबळ जमिनीतील सोयाबीन नष्ट झाले असून, काळ्य़ा भारी जमिनीतील सोयाबीन शेवटच्या घटका मोजत आहे.पाऊस नसल्याचे सोयाबीनच्या शेंगातील दाणे भरले नाही. त्यामुळे शेंगाचे दाणे पोचट आहेत. यावर्षी वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने पेरण्यांना हा पाऊस पोषक ठरला. जुलै-ऑगस्ट महिन्यातच पावसाने जवळपास सरासरी गाठली. पिकांची वाढही जोमदार झाली; पण ऐन पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आली असताना पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांवर दुष्परिणाम होत आहे.पश्‍चिम विदर्भातील ३२ लाख हेक्टरपैकी साडेचौदा लाख हेक्टरवर यावर्षी सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे पीक ७0 टक्के शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. ज्या शेतकर्‍यांनी १0 जुलैनंतर पेरणी केली तेथे हे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. शेंगा धरण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारली आहे. परिणामी, सोयाबीनच्या दाण्याचा आकार कमी झाला आहे.हलक्या जमिनीतील सोयाबीनवर अधिक परिणाम झाला असून, भारी, काळ्य़ा जमिनीतील शेंगांवर आता दुष्परिणाम होत आहे. मागील तीन, चार वर्षानंतर यावर्षी सोयाबीन पीक जोमदार वाढल्याने शेतकरी आनंदित आहे; पण पावसाने त्यांच्या आनंदावर विरजण टाकले आहे.मान्सूनपूर्व बीटी कापसाने बोंड्या धरल्या असून, इतरही बीटी कापसाला फुले आली आहेत. यावर्षी कापसाचे पीक उत्तम असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; पण पाण्याचा ताण सहन करण्यापलीकडे या पिकाची क्षमता संपली आहे. शेतकर्‍यांना आता पाऊस हवा असल्याने शेतकर्‍यांचे डोळे पुन्हा नभाकडे लागले आहेत.