शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

सोयाबीनचे पीक करपले !

By admin | Updated: September 14, 2016 02:02 IST

अकोला जिल्हय़ातील शेतक-यांच्या हरित स्वप्नावर फेरले पाणी.

अकोला, दि. १३ : पाच आठवडे झाले पावसाने दडी मारल्याने जिल्हय़ातील सोयाबीनचे पीक करपले असून, सतत पाच वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांच्या हरित स्वप्नावर यावर्षी पाणी फिरले आहे. सोयाबीनच्या शेंगा परिपक्वतेच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारली आहे. त्याचा परिणाम शेंगावर झाला आहे.खरीप हंगामातील पिके परिपक्वतेच्या अवस्थेत असतानाच पावसाने प्रदीर्घ दडी मारली. पाण्याचा ताण पडल्याने पिके करपत असून, खरबळ जमिनीतील सोयाबीन नष्ट झाले असून, काळ्य़ा भारी जमिनीतील सोयाबीन शेवटच्या घटका मोजत आहे.पाऊस नसल्याचे सोयाबीनच्या शेंगातील दाणे भरले नाही. त्यामुळे शेंगाचे दाणे पोचट आहेत. यावर्षी वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने पेरण्यांना हा पाऊस पोषक ठरला. जुलै-ऑगस्ट महिन्यातच पावसाने जवळपास सरासरी गाठली. पिकांची वाढही जोमदार झाली; पण ऐन पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आली असताना पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांवर दुष्परिणाम होत आहे.पश्‍चिम विदर्भातील ३२ लाख हेक्टरपैकी साडेचौदा लाख हेक्टरवर यावर्षी सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे पीक ७0 टक्के शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. ज्या शेतकर्‍यांनी १0 जुलैनंतर पेरणी केली तेथे हे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. शेंगा धरण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारली आहे. परिणामी, सोयाबीनच्या दाण्याचा आकार कमी झाला आहे.हलक्या जमिनीतील सोयाबीनवर अधिक परिणाम झाला असून, भारी, काळ्य़ा जमिनीतील शेंगांवर आता दुष्परिणाम होत आहे. मागील तीन, चार वर्षानंतर यावर्षी सोयाबीन पीक जोमदार वाढल्याने शेतकरी आनंदित आहे; पण पावसाने त्यांच्या आनंदावर विरजण टाकले आहे.मान्सूनपूर्व बीटी कापसाने बोंड्या धरल्या असून, इतरही बीटी कापसाला फुले आली आहेत. यावर्षी कापसाचे पीक उत्तम असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; पण पाण्याचा ताण सहन करण्यापलीकडे या पिकाची क्षमता संपली आहे. शेतकर्‍यांना आता पाऊस हवा असल्याने शेतकर्‍यांचे डोळे पुन्हा नभाकडे लागले आहेत.