शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वाडी अदमपूर येथे सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:23 IST

तेल्हारा : तालुक्यातील वाडी आदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे या शेतकऱ्याने शहरातील एका कृषी सेवा केंद्रातून सोयाबीनचे बियाणे विकत ...

तेल्हारा : तालुक्यातील वाडी आदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे या शेतकऱ्याने शहरातील एका कृषी सेवा केंद्रातून सोयाबीनचे बियाणे विकत घेऊन पेरणी केली. मात्र, सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तालुक्यातील वाडी अदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे यांचे वाडी अहमदपूर शेतशिवारात १ हेक्टर ९६ आर शेती आहे. त्यासाठी त्यांनी तेल्हारा येथील एका कृषी केंद्रातून दि.४ जून २०२१ रोजी पाच बॅग बियाणे खरेदी केले. पेरणीनंतर त्यांनी शेताचे निरीक्षण केले असता एक बॅग ज्या शेतात पेरली तिला शेंगांची संख्या भरपूर आहे. मात्र, चार बॅग बोगस असल्याने शेंगाच नसल्याचा आरोप शेतकऱ्याने तक्रारीतून केला आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन मदत करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. त्यांनी अर्जाच्या प्रतिलिपी तालुका कृषी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अकोला यांच्याकडे दिल्या आहेत.

----------

तक्रारीवर तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती पिकाची पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला जाईल. -भरत चव्हाण, गटविकास अधिकारी तथा कृषी अधिकारी पंचायत समिती तेल्हारा