शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

वाडी अदमपूर येथे सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:23 IST

तेल्हारा : तालुक्यातील वाडी आदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे या शेतकऱ्याने शहरातील एका कृषी सेवा केंद्रातून सोयाबीनचे बियाणे विकत ...

तेल्हारा : तालुक्यातील वाडी आदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे या शेतकऱ्याने शहरातील एका कृषी सेवा केंद्रातून सोयाबीनचे बियाणे विकत घेऊन पेरणी केली. मात्र, सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तालुक्यातील वाडी अदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे यांचे वाडी अहमदपूर शेतशिवारात १ हेक्टर ९६ आर शेती आहे. त्यासाठी त्यांनी तेल्हारा येथील एका कृषी केंद्रातून दि.४ जून २०२१ रोजी पाच बॅग बियाणे खरेदी केले. पेरणीनंतर त्यांनी शेताचे निरीक्षण केले असता एक बॅग ज्या शेतात पेरली तिला शेंगांची संख्या भरपूर आहे. मात्र, चार बॅग बोगस असल्याने शेंगाच नसल्याचा आरोप शेतकऱ्याने तक्रारीतून केला आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन मदत करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. त्यांनी अर्जाच्या प्रतिलिपी तालुका कृषी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अकोला यांच्याकडे दिल्या आहेत.

----------

तक्रारीवर तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती पिकाची पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला जाईल. -भरत चव्हाण, गटविकास अधिकारी तथा कृषी अधिकारी पंचायत समिती तेल्हारा