शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

सोयाबीन पिकाला शेंगाच नाहीत; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

खिरपुरी : परिसरात यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली असून, खिरपुरी बु. शिवारात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र, गत महिन्यात ...

खिरपुरी : परिसरात यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली असून, खिरपुरी बु. शिवारात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र, गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनची फूलगळ झाल्याने, तसेच चक्रीभूंगा, खोडकीड, आदी रोगांचे आक्रमणाने सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, या भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. गेल्या मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उडीद, मुगाचे हातातोंडाशी आलेले पीक गेले, तर कपाशी पिकावर लाल्या, कोकडा या रोगराईमुळे कपाशीची वाढच झाली नाही. शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

जुलै महिन्यात परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते, तर गावात घरात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले. ही अतिवृष्टी सोयाबीन फुलावर असताना झाली, तसेच काही भागात संततधार पावसामुळे सोयाबीनला फुलोरा लागलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल होणार नसल्याचे चित्र आहे.

------------------------------

मी माझ्या शेतामध्ये सोयाबीनची लागवड केली आहे. सोयाबीनची पेरणी करून ७० दिवस उलटूनही फुले व शेंगा लागल्या नाहीत. कृषी विभाग व पीक विमा कंपनींनी सर्व्हे करून आर्थिक मदत करावी.

- प्रवीण दांदळे, शेतकरी, खिरपुरी बु.

-------------------------------

कपाशीची वाढ खुंटली!

बाळापूर तालुक्यात कपाशीचा पेरा कमी आहे. खिरपूरी बु. परिसरात काही शेतकऱ्यांनी कपाशीला पसंती देऊन पेरणी केली. मात्र, संततधार पावसामुळे कपाशीवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. तसेच कपाशीची वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.