शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन-कपाशी पीक विम्याचे १0 कोटी गेले परत!

By admin | Updated: April 1, 2017 02:54 IST

जिल्हय़ातील शेतक-यांना पीक विमा रकमेच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

संतोष येलकर अकोला, दि. ३१- गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा न काढलेल्या जिल्हय़ातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांना पीक विम्याच्या ५0 टक्के पीक नुकसानभरपाईची रक्कम देण्यासाठी शासनामार्फत प्राप्त झालेल्या ६0 कोटी ३७ लाख ६२ हजार रुपयांच्या मदत निधीपैकी अखर्चित ९ कोटी ६३ लाख १७ हजार रुपयांचा निधी ३१ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे परत करण्यात आला. अखर्चित निधी शासन खात्यात जमा करण्यात आल्याने, जिल्हय़ातील शेतकर्‍यांना पीक विमा रकमेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. नापिकीमुळे जिल्हय़ातील शेतकरी हवालदिल झाला होता. या पृष्ठभूमीवर सन २0१५ च्या खरीप हंगामात पीक विमा न काढलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंंत पीक विम्याच्या ५0 टक्के पीक नुकसानभरपाईची मदत वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. सन २0१५ च्या खरीप हंगामात जिल्हय़ात १ लाख ५७ हजार १0२ शेतकर्‍यांनी १ लाख ४८ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढला नसून, तीन तालुक्यांत १२ हजार ८५२ शेतकर्‍यांनी १३ हजार ४५८ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाचा विमा काढला नाही. त्यानुसार गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा न काढलेल्या जिल्हय़ातील सोयाबीन व कापूस उत्पादक १ लाख ६९ हजार ९५४ शेतकर्‍यांना पीक विम्याच्या ५0 टक्के मदत वाटपासाठी ६0 कोटी ३७ लाख ६२ हजार ६५८ रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत गत ११ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १२ जानेवारी रोजी जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला होता. मागणीनंतर परत मिळणार मदतनिधी!सोयाबीन व कापूस पीक विमा न काढलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना पीक विम्याच्या ५0 टक्के रकमेची मदत देण्यासाठी उपलब्ध निधीपैकी अखर्चित राहिलेला निधी शासनाकडे परत करण्यात आला आहे. शासनाकडे परत करण्यात आलेला निधी परत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे मागणी केली जाणार आहे. त्यानुसार परत गेलेल्या पीक विम्याचा निधी परत मिळणार आहे; मात्र निधी उपलब्ध होईपर्यंंत जिल्हय़ातील शेतकर्‍यांना पीक विमा रकमेच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.