शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पश्‍चिम विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र पोहोचले ६६ टक्क्यांवर!

By admin | Updated: July 6, 2016 01:22 IST

पश्‍चिम विदर्भात ८ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कापसाचे क्षेत्र मात्र घटले.

अकोला: पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक स्वरू पाच्या पावसाला सुरुवात झाल्याने पेरणीची गती वाढली असून, ५ जुलैपर्यंत ७0 टक्क्यांपर्यंत पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ६६ टक्के म्हणजे ८ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कापूस या नगदी पिकाचे क्षेत्र मात्र घटले आहे; परंतु यवतमाळ या एका जिल्हय़ात कापसाचे क्षेत्र वाढले आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पेरणीलायक क्षेत्र ३२ लाख ७५ हजार २00 हेक्टर आहे, मागील आठवड्यापासून बर्‍यापैकी पाऊस होत असल्याने पेरणीला वेग आला आहे. कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरू न यावर्षीही सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे चित्र आहे. सोयबीन ८ लाख ३४ हजार ६00 तर कापूस केवळ ५८ टक्के म्हणजे ६ लाख ३५ हजार ६00 हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार १00 हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. उर्वरित जिल्हय़ात मात्र सोयाबीन आघाडीवर आहे.कापूस हे विदर्भाचे नगदी पीक; परंतु उत्पादनावर आधारित दर मिळत नसल्याने अलीकडच्या दहा वर्षात हे पीक मागे पडले असून, याची जागा सोयाबीनने घेतली आहे. यावर्षी ५ जुलैपर्यंंत बुलडणा जिल्हय़ात २ लाख ७ हजार ३00 हेक्टरवर सोयाबीन तर ८८ हजार हेक्टरवर कापसाची पेरणी शेतकर्‍यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यात ८६ हजार ३00 हेक्टर सोयबीन तर कापूस ४२ हजार ७00 हेक्टर, वाशिम सोयाबीन १ लाख ६६ हजार ९00 हे. आणि कापूस केवळ ९ हजार ६00 हे., अमरावती सोयाबीन १ लाख ८१ हजार ५00 हे. तर कापूस १ लाख १८ हजार ९00 हेक्टर पेरणी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मात्र कापूस सर्वाधिक ३ लाख ७६ हजार १00 हे. तर सोयाबीन १ लाख ९२ हजार ६00 हेक्टरवर पेरण्यात आले.दरम्यान, सध्या सर्वत्र पाऊस सुरू असल्याने काही भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत.