शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पश्‍चिम विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र पोहोचले ६६ टक्क्यांवर!

By admin | Updated: July 6, 2016 01:22 IST

पश्‍चिम विदर्भात ८ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कापसाचे क्षेत्र मात्र घटले.

अकोला: पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक स्वरू पाच्या पावसाला सुरुवात झाल्याने पेरणीची गती वाढली असून, ५ जुलैपर्यंत ७0 टक्क्यांपर्यंत पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ६६ टक्के म्हणजे ८ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कापूस या नगदी पिकाचे क्षेत्र मात्र घटले आहे; परंतु यवतमाळ या एका जिल्हय़ात कापसाचे क्षेत्र वाढले आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पेरणीलायक क्षेत्र ३२ लाख ७५ हजार २00 हेक्टर आहे, मागील आठवड्यापासून बर्‍यापैकी पाऊस होत असल्याने पेरणीला वेग आला आहे. कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरू न यावर्षीही सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे चित्र आहे. सोयबीन ८ लाख ३४ हजार ६00 तर कापूस केवळ ५८ टक्के म्हणजे ६ लाख ३५ हजार ६00 हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार १00 हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. उर्वरित जिल्हय़ात मात्र सोयाबीन आघाडीवर आहे.कापूस हे विदर्भाचे नगदी पीक; परंतु उत्पादनावर आधारित दर मिळत नसल्याने अलीकडच्या दहा वर्षात हे पीक मागे पडले असून, याची जागा सोयाबीनने घेतली आहे. यावर्षी ५ जुलैपर्यंंत बुलडणा जिल्हय़ात २ लाख ७ हजार ३00 हेक्टरवर सोयाबीन तर ८८ हजार हेक्टरवर कापसाची पेरणी शेतकर्‍यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यात ८६ हजार ३00 हेक्टर सोयबीन तर कापूस ४२ हजार ७00 हेक्टर, वाशिम सोयाबीन १ लाख ६६ हजार ९00 हे. आणि कापूस केवळ ९ हजार ६00 हे., अमरावती सोयाबीन १ लाख ८१ हजार ५00 हे. तर कापूस १ लाख १८ हजार ९00 हेक्टर पेरणी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मात्र कापूस सर्वाधिक ३ लाख ७६ हजार १00 हे. तर सोयाबीन १ लाख ९२ हजार ६00 हेक्टरवर पेरण्यात आले.दरम्यान, सध्या सर्वत्र पाऊस सुरू असल्याने काही भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत.