शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

वऱ्हाडात  सोयाबीनच्या भरघोस उत्पादनाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 18:10 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असून, यावर्षी शेतकऱ्यांनी प्रथम सोयाबीन व दुसºया क्रमाकांवर कपाशी पेरणी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काही भाग वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत पिके बहरली असून, अनुकूल हवामान राहिल्यास यावर्षी सोयाबीनचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.वºहाडात यावर्षी बुलडाणा जिल्हा वगळता ...

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ५९१ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली. अकोला जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ४१२ हेक्टर आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असून, यावर्षी शेतकऱ्यांनी प्रथम सोयाबीन व दुसºया क्रमाकांवर कपाशी पेरणी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काही भाग वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत पिके बहरली असून, अनुकूल हवामान राहिल्यास यावर्षी सोयाबीनचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.वºहाडात यावर्षी बुलडाणा जिल्हा वगळता उत्तम पाऊस झाला असून, शेतकºयांनी सोयाबीनला पसंती देत खरिपाच्या ३२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १४ लाख ३० हजार १५२ हेक्टरवर सोयाबीन पेरणी केली. यामध्ये सर्वात जास्त बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ५९१ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली. त्या खोलाखाल अमरावती जिल्ह्यात २ लाख ९२ हजार २४७ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात २ लाख ८७ हजार २६२ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ७१ हजार ५८४ तर अकोला जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.मागील वर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने शेतकºयांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला असून, या पिकासाठी लागणारा पाऊस वेळेवर होत असल्याने सोयाबीन पीक बहरले आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकºयांनी तणनाशके वापरू न तणाचा नायनाट करण्यावर भर दिला असून, डवरणी तसेच या पिकाच्या वाढ व भरघोस उत्पादनासाठी विविध औषधांची फवारणी सुरू केल्याचे चित्र आहे. अल्प प्रमाणात कीड आली आहे; पण ती कीड नुकसान पातळीपेक्षा कमी असल्याने शेतकºयांनी किडींचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे.दरम्यान, यावर्षी कापूस ९ लाख ५० हजार ८६५ हेक्टरवर पेरणी करण्यात आला असून, तुरीचीही यावर्षी ४ लाख ३४ हजार २७२ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ४१२ हेक्टर आहे.

- सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, यावर्षी पिकांना अनुकूल वातावरण आहे. असेच हवामान राहिल्यास यावर्षी सर्वच पिकांसह सोयाबीनचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता आहे.सुभाष नागरे,विभागीय कृषी सहसंचालक,अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती