शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात  सोयाबीनच्या भरघोस उत्पादनाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 18:10 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असून, यावर्षी शेतकऱ्यांनी प्रथम सोयाबीन व दुसºया क्रमाकांवर कपाशी पेरणी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काही भाग वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत पिके बहरली असून, अनुकूल हवामान राहिल्यास यावर्षी सोयाबीनचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.वºहाडात यावर्षी बुलडाणा जिल्हा वगळता ...

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ५९१ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली. अकोला जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ४१२ हेक्टर आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असून, यावर्षी शेतकऱ्यांनी प्रथम सोयाबीन व दुसºया क्रमाकांवर कपाशी पेरणी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काही भाग वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत पिके बहरली असून, अनुकूल हवामान राहिल्यास यावर्षी सोयाबीनचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.वºहाडात यावर्षी बुलडाणा जिल्हा वगळता उत्तम पाऊस झाला असून, शेतकºयांनी सोयाबीनला पसंती देत खरिपाच्या ३२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १४ लाख ३० हजार १५२ हेक्टरवर सोयाबीन पेरणी केली. यामध्ये सर्वात जास्त बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ५९१ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली. त्या खोलाखाल अमरावती जिल्ह्यात २ लाख ९२ हजार २४७ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात २ लाख ८७ हजार २६२ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ७१ हजार ५८४ तर अकोला जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.मागील वर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने शेतकºयांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला असून, या पिकासाठी लागणारा पाऊस वेळेवर होत असल्याने सोयाबीन पीक बहरले आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकºयांनी तणनाशके वापरू न तणाचा नायनाट करण्यावर भर दिला असून, डवरणी तसेच या पिकाच्या वाढ व भरघोस उत्पादनासाठी विविध औषधांची फवारणी सुरू केल्याचे चित्र आहे. अल्प प्रमाणात कीड आली आहे; पण ती कीड नुकसान पातळीपेक्षा कमी असल्याने शेतकºयांनी किडींचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे.दरम्यान, यावर्षी कापूस ९ लाख ५० हजार ८६५ हेक्टरवर पेरणी करण्यात आला असून, तुरीचीही यावर्षी ४ लाख ३४ हजार २७२ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ४१२ हेक्टर आहे.

- सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, यावर्षी पिकांना अनुकूल वातावरण आहे. असेच हवामान राहिल्यास यावर्षी सर्वच पिकांसह सोयाबीनचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता आहे.सुभाष नागरे,विभागीय कृषी सहसंचालक,अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती