शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

वऱ्हाडात  सोयाबीनच्या भरघोस उत्पादनाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 18:10 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असून, यावर्षी शेतकऱ्यांनी प्रथम सोयाबीन व दुसºया क्रमाकांवर कपाशी पेरणी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काही भाग वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत पिके बहरली असून, अनुकूल हवामान राहिल्यास यावर्षी सोयाबीनचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.वºहाडात यावर्षी बुलडाणा जिल्हा वगळता ...

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ५९१ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली. अकोला जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ४१२ हेक्टर आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असून, यावर्षी शेतकऱ्यांनी प्रथम सोयाबीन व दुसºया क्रमाकांवर कपाशी पेरणी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काही भाग वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत पिके बहरली असून, अनुकूल हवामान राहिल्यास यावर्षी सोयाबीनचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.वºहाडात यावर्षी बुलडाणा जिल्हा वगळता उत्तम पाऊस झाला असून, शेतकºयांनी सोयाबीनला पसंती देत खरिपाच्या ३२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १४ लाख ३० हजार १५२ हेक्टरवर सोयाबीन पेरणी केली. यामध्ये सर्वात जास्त बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ५९१ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली. त्या खोलाखाल अमरावती जिल्ह्यात २ लाख ९२ हजार २४७ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात २ लाख ८७ हजार २६२ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ७१ हजार ५८४ तर अकोला जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.मागील वर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने शेतकºयांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला असून, या पिकासाठी लागणारा पाऊस वेळेवर होत असल्याने सोयाबीन पीक बहरले आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकºयांनी तणनाशके वापरू न तणाचा नायनाट करण्यावर भर दिला असून, डवरणी तसेच या पिकाच्या वाढ व भरघोस उत्पादनासाठी विविध औषधांची फवारणी सुरू केल्याचे चित्र आहे. अल्प प्रमाणात कीड आली आहे; पण ती कीड नुकसान पातळीपेक्षा कमी असल्याने शेतकºयांनी किडींचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे.दरम्यान, यावर्षी कापूस ९ लाख ५० हजार ८६५ हेक्टरवर पेरणी करण्यात आला असून, तुरीचीही यावर्षी ४ लाख ३४ हजार २७२ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ४१२ हेक्टर आहे.

- सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, यावर्षी पिकांना अनुकूल वातावरण आहे. असेच हवामान राहिल्यास यावर्षी सर्वच पिकांसह सोयाबीनचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता आहे.सुभाष नागरे,विभागीय कृषी सहसंचालक,अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती