शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

साठा निर्बंधातून सोयाबीन वगळले!

By admin | Updated: November 18, 2016 03:09 IST

जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत असलेल्या साठा निर्बंधातून सोयाबीन वगळण्यात येत असल्याचा शासनाचा आदेश.

संतोष येलकरअकोला, दि. १७- अकोला जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत असलेल्या साठा निर्बंधातून सोयाबीन वगळण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत ८ नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे आता सोयाबीन साठवणुकीसाठी र्मयादा राहणार नाही.शासनाच्या गत २९ सप्टेंबर रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि ३0 सप्टेंबर रोजीच्या पत्राप्रमाणे डाळी, खाद्य तेल व खाद्य तेलबिया या जीवनाश्यक वस्तूंवरील साठा निर्बंधास ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; परंतु सद्यस्थितीत राज्यात खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादन जास्त प्रमाणात झाल्याने, बाजारात सोयाबीनच्या दरात घट झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. बाजारात सोयाबीनचे दर घसरल्याने मिळेल त्या भावात कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांवर आली आहे. या पृष्ठभूमीवर सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी ५ नोव्हेंबरपासून सोयाबीनला साठा निर्बंधातून वगळण्यात येत असल्याचा आदेश गत ८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांसह संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आला आहे. सोयाबीन साठा निर्बंधातून वगळण्यात आल्याने, सोयाबीनची साठवणूक करण्यास र्मयादेचे बंधन राहणार नाही. घाऊक व्यापारासाठी परवान्याची नाही गरज!साठा निर्बंधातून सोयाबीनला वगळण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र घाऊक व्यापार परवाना आदेश, २0१५ च्या नियम ३ नुसार, सोयाबीनच्या घाऊक व्यापारासाठी परवाना घेण्याची आवश्यकता राहणार नाही, असेही शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.जीवनाश्यक वस्तू अधिनियमांतर्गत लागू असलेल्या साठा निर्बंधातून सोयाबीन वगळण्यात आले असून, यासंबंधी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाचा आदेश प्राप्त झाला आहे. साठा निर्बंधातून वगळण्यात आल्याने, सोयाबीन साठवणुकीला र्मयादा राहणार नाही.-अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.