शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

सोयाबीन, कापसाला भाव देऊन दुष्काळ जाहीर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:12 IST

अकोला: शेतमालाला योग्य भाव देण्यासह जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करण्यासाठी ‘एल्गार’ पुकारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचा ‘एल्गार ’ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेतमालाला योग्य भाव देण्यासह जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करण्यासाठी ‘एल्गार’ पुकारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.सोयाबीन प्रतिक्विंटल किमान ५ हजार रुपये, कापूस प्रतिक्विंटल ७ हजार रुपये आणि तुरीला प्रतिक्विंटल किमान ७ हजार रुपये भाव देण्यात यावा तसेच पाऊस कमी झाल्याने जिल्हय़ात मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. नापिकीमुळे जिल्हय़ातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, इत्यादी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या धरणे आंदोलनात माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार तुकाराम बिरकड, प्रा. विश्‍वनाथ कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदाणी, विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, श्रीकांत पिसे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष पद्मा अहेरकर, अँड. महेश सरप, भारती नीम, राजू बोचे, छाया कात्रे, नजिमा शेख, पंकज गावंडे, नगरसेविका उषा विरक, शंकरराव चौधरी, कैलास गोंडचवर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, शिवाजी म्हैसने, डॉ. आशा मिरगे, सचिन वाकोडे, रहीम पेंटर, मनोज गायकवाड, फैय्याजभाई, अजय रामटेके, अख्तर कुरेशी, दिलीप देशमुख, नितीन झापर्डे, अजय पागृत, गौतम गवई, रूपाली वाकोडे, महादेव साबे, गजानान म्हसने, लता वर्मा, प्रमोद लहाने, डॉ. अविनाश गावंडे, श्रीधर कांबे, छाया देशमुख, छाया कात्रे, अरुणा देशमुख, पंकज बाजारे, निखिल गावंडे, ज्ञानेश्‍वर माळी, बाळासाहेब तायडे, शुभम गोंडचवर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हय़ातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सावकारी कर्जमाफीचा शेतकर्‍यांना लाभ नाही; आंदोलन छेडणार-गुलाबराव गावंडे परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांसाठी शासनाने दोन वर्षांंपूर्वी कर्जमाफी जाहीर केली. राज्यातील शेतकर्‍यांना सावकारी कर्जमाफी देण्यासाठी २७१ कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली; मात्र या कर्जमाफीचा लाभ अद्यापही शेतकर्‍यांना मिळाला नाही. जिल्हय़ात ३ हजार शेतकर्‍यांनी सावकारांकडे सोने गहान ठेवले आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या सावकारी कर्जमाफीसाठी सात कोटींचा निधी प्राप्त झाला; मात्र या कर्जमाफीचा लाभ केवळ १२ शेतकर्‍यांना मिळाला. उर्वरित शेतकर्‍यांना सावकारी कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे यासंदर्भात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :agricultureशेती