शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

अकोला जिल्ह्यातील चार टक्के क्षेत्रावर पेरणी!

By admin | Updated: June 17, 2017 01:19 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढली तिफण; साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रावर कापूसच!

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसत असून, अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तिफण बाहेर काढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी कापूस पेरणीला पसंती दिली असून, ६,५३८ हेक्टरवर केवळ कापसाची पेरणी झाली आहे.पाऊस, कर्जमाफी, बँकेक डून मिळणाऱ्या पीक कर्जाची प्रतीक्षा, या सर्व पृष्ठभूमीवर बियाणे बाजारात शुकशुकाट होता. पण, पेरणी करावीच लागणार असल्याने शेवटी गुरुवारपासून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. दोन दिवसांत ४० ते ४५ टक्के बियाणे खरेदी करण्यात आली असून, ५५ टक्के बियाणे खरेदी बाकी आहे.जिल्ह्यातील ४ लाख ८६ हजार ६०० हेक्टरसाठी कृषी विभागाने विविध खरीप पिकांचे नियोजन केले आहे. गेल्यावर्षी जवळपास २ लाख ३० हजार हेक्टरवर सोयाबीन, तर १ लाख २० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा केला होता. यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनची मागणी वाढली असली, तरी शेतकऱ्यांनी सध्यातरी कापसाचीच पेरणी केली आहे. यावर्षी २ लाख १५ हजार हेक्टरवर कृषी विभागाने सोयाबीनचे नियोजन केले आहे. कापसाचे गतवर्षीप्रमाणे १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र कायम राहील, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. असे असले तरी सुरुवातीच्या टप्प्यात कापूस बियाण्यांची पेरणी करण्यात आली आहे.दरम्यान, यावर्षी तूर ७० हजार हेक्टर, मूग ३१ हजार हेक्टर, उडीद २० हजार हेक्टर, ज्वारी २२,५०० हजार हेक्टर, बाजरी २२५ हजार हेक्टर, मका ३५० हजार हेक्टर, सूर्यफूल एक हजार हेक्टर, तर तिळाचे १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील या विविध पिकांसाठी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यासाठी ७३ हजार ५०४ क्ंिवटल बियाणे उपलब्ध झाले असून, ३४ हजार ५९७ क्ंिवटल बियाण्यांची विक्री झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र घटणार!सोयाबीनचे क्षेत्र १५ हजार हेक्टरने कमी होण्याची शक्यता आहे. कापसाचे सरासरी पेरणी क्षेत्र गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कायम राहील. पण, सुरुवातीला जिल्ह्यात कापूस बियाणे पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याने यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याचे संकेत आहेत.दमदार पावसाची प्रतीक्षाशेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने नांगरटी केली, पण पट्टापास मशागतीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.अकोट तालुक्यात पेरणीला वेगजिल्ह्यात सर्वाधिक ४,२०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी सुरुवातीला कापूस बियाणे पेरणी केली आहे, तर सर्वाधिक कमी पेरणी अकोला तालुक्यात झाली.बियाणे खरेदीला सुरुवात झाली असून, घाऊक खरेदी जवळपास ८० टक्क्यांपर्यंत झाली आहे, तसेच किरकोळ बियाणे खरेदीला वेग आला आहे.- मिलिंद सावजी, - मोहन सोनोने,बियाणे विपणन अभ्यासक, अकोला.