शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

लवकरच ‘गो इंडिया’ स्मार्ट कार्डद्वारे मिळेल रेल्वे तिकीट

By admin | Updated: January 31, 2015 00:37 IST

किमान २0, जास्तीत जास्त पाच हजारांपर्यंत करता येईल रिचार्ज.

अकोला : रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना यापुढे खिशात पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही. त्यांना केवळ 'गो इंडिया' स्मार्ट कार्ड त्यांना बाळगावे लागेल. त्याचा फायदा म्हणजे, रांगेत तिकीट काढताना सुट्या पैशांच्या कटकटीतून कायमची सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासन ही सुविधा लवकरच संपूर्ण देशात सुरू करणार असल्याची माहिती आहे.'गो इंडिया'या स्मार्ट कार्डद्वारे सामान्य आणि आरक्षित अशी दोन्ही प्रकारची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. या कार्डद्वारे प्रवाशांना क्लॉक रूम व रिटायरिंग रूमचे बुकिंग करण्याची सुविधादेखील मिळेल. विशेष बाब म्हणजे, या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करणार्‍या प्रवाशास पाच टक्के सूट मिळणार आहे. स्मार्ट कार्ड योजनेच्या अंमलबजावणीसाठी रेल्वेच्या संगणकीय प्रणालीत विशेष बदल करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने २३ जानेवारी रोजी जारी केले असल्याची माहिती आहे. प्रायोगिक तत्त्वावर 'गो इंडिया' स्मार्ट कार्ड योजना मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा या देशातील दोन प्रमुख रेल्वे मार्गांवर राबविण्यात येणार आहे. या प्रथम टप्प्यात संबंधित सर्व अडचणी दूर केल्या जातील. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात ही योजना संपूर्ण देशत लागू केली जाणार आहे.