शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

व-हाडात आतापर्यंत एक लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान!

By admin | Updated: April 15, 2015 02:00 IST

शनिवारच्या पावसामुळे अकोला जिल्हय़ात १६00 हेक्टरवरील फळ, पिकांना फटका.

अकोला : जानेवारी महिन्यापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील एक लाख हेक्टरच्यावर गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. पण, एप्रिल महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे नुकसानाचे आकडे बदलत असून, पुन्हा सर्वेक्षण सुरू आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती याच पाच जिल्हय़ात गेल्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे उत्पादन घटले आहे. रब्बी पिकांवर आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांना या पावसाने पीक ऐन काढणीच्यावेळी फटका दिल्याने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तेव्हापासून अवकाळी पाऊस सुरू असून, शेतकर्‍यांना उसंत देत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या अवकाळी पावसाला १४ डिसेंबरपासून सुरुवात झाली, ते जानेवारी १५ पर्यंत हा पाऊस अधूनमधून सुरू होता. सोसाट्याचा वारा, गारासंह आलेल्या या पावसामुळे पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्हय़ातील ८,८७0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ९ ते १५ फेब्रुवारीपर्यंत आलेल्या या अवकाळी पावसाचा ९,९३७ हेक्टर क्षेत्रावरील सर्वच प्रकारच्या पिकांना प्रचंड फटका बसला, पण हा पाऊस उसंतच देत नसल्याने पुन्हा २८ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत पडलेल्या पावसामुळे सर्वाधिक ४५ हजार ३९0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. ८ ते १२ मार्चपर्यंत हा पाऊस सतत सुरू असल्याने या पाच जिल्हय़ातील १६,६४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. यावर्षीच्या पावसाळ्य़ात कमी पाऊस झाल्याने उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला, तर रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी अवकाळी पावसाने दगा दिला आहे. एप्रिल महिन्यात पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शनिवारी व रविवारी प्रचंड गारांसह पाऊस कोसळला. या पावसामुळे अकोला जिल्हय़ातील १६00 हेक्टरवरील फळे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.