शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

व-हाडात आतापर्यंत एक लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान!

By admin | Updated: April 15, 2015 02:00 IST

शनिवारच्या पावसामुळे अकोला जिल्हय़ात १६00 हेक्टरवरील फळ, पिकांना फटका.

अकोला : जानेवारी महिन्यापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील एक लाख हेक्टरच्यावर गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. पण, एप्रिल महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे नुकसानाचे आकडे बदलत असून, पुन्हा सर्वेक्षण सुरू आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती याच पाच जिल्हय़ात गेल्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे उत्पादन घटले आहे. रब्बी पिकांवर आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांना या पावसाने पीक ऐन काढणीच्यावेळी फटका दिल्याने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तेव्हापासून अवकाळी पाऊस सुरू असून, शेतकर्‍यांना उसंत देत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या अवकाळी पावसाला १४ डिसेंबरपासून सुरुवात झाली, ते जानेवारी १५ पर्यंत हा पाऊस अधूनमधून सुरू होता. सोसाट्याचा वारा, गारासंह आलेल्या या पावसामुळे पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्हय़ातील ८,८७0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ९ ते १५ फेब्रुवारीपर्यंत आलेल्या या अवकाळी पावसाचा ९,९३७ हेक्टर क्षेत्रावरील सर्वच प्रकारच्या पिकांना प्रचंड फटका बसला, पण हा पाऊस उसंतच देत नसल्याने पुन्हा २८ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत पडलेल्या पावसामुळे सर्वाधिक ४५ हजार ३९0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. ८ ते १२ मार्चपर्यंत हा पाऊस सतत सुरू असल्याने या पाच जिल्हय़ातील १६,६४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. यावर्षीच्या पावसाळ्य़ात कमी पाऊस झाल्याने उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला, तर रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी अवकाळी पावसाने दगा दिला आहे. एप्रिल महिन्यात पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शनिवारी व रविवारी प्रचंड गारांसह पाऊस कोसळला. या पावसामुळे अकोला जिल्हय़ातील १६00 हेक्टरवरील फळे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.