शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

सामाजिक संवेदना झाल्या बोथट

By admin | Updated: July 5, 2014 01:00 IST

बलात्काराच्या घटनेनंतर निषेधाचा सूर मंद, कुठेही प्रतिक्रिया नाही

मलकापूर : मलकापूरच्या नावाला काळीमा फासणारी घटना परवा घडली. कुमारिकेवर वासनांध तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. मात्र राजकीय, सामाजिक संघटनांकडून एक दोन अपवाद वगळता जिल्हाभरात साधा निषेधही नोंदविण्यात आला नाही. त्यामुळे येथील सामाजिक संवेदना बोथट झाली की अशा प्रकारांना मुक सर्मथन? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाच्या तालुक्यांपैकी एक असे मलकापूर. जातीय दंगलीकरिता एकेकाळी कुप्रसिध्द त्यामुळेच शासन दरबारी अतिसंवेदनशिल स्थळ म्हणून त्याची नोंद होती, अर्थात मागील दोन दशकात तशी परिस्थिती राहिली नाही, पण वाद भांडण, घोडी कुरघोडी सुरुच असतात. इतर ठिकाणसारख्याच छोट्यामोठय़ा घटना इथेही घडतात मात्र एखाद्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घडलेली घटना येथील समाजीक स्वास्थ धोक्यात आल्याचे लक्षण आहे. परवा रात्री एक कुमारीका याच जिल्ह्यातील मात्र सद्याचे वास्तव्य मुंबईत तिच्या मावशासह मलकापुरात येते अन तिच्यावर सामूहिक बलात्कार वासनांध तरुण करतात ही तर दूष्कृत्याची परिसिमाच आहे. दिल्लीतल्या बलात्काराने मलकापूरकर प्रभावित होतात. वेळप्रसंगी आरोपींचे फाशीसाठी कँडलमार्चच्या माध्यमातून रस्त्यावर येतात. वृत्तपत्रात छापूनही आणण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे अनेकदा घडले आहे.इथे मात्र परिस्थिती पुरती वेगळीच निदर्शनास येते. पोलिसांनी पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात आरोपींना अटक करण्यापासून तर गुन्ह्याचा तपास व आरोपींवर निर्धारीत केलेल्या कलमा बघता केलेली कारवाई चोख अशीच आहे. मात्र राजकारण व समाजकारणात काम करणार्‍या काँग्रेस कमेटी व मनसे वगळता कोणीही निषेधाचा सुर लावला नाही. काल आरोपीना न्यायालयात नेले होते तेथे बलात्कारीत कुमारीकेला बघण्यासाठी जिवाचा आटापिटा अनेकांनी केला यामधून आपली मानसीकता कुठे जात आहे याचे प्रत्यंतर आले मात्र एवढाच आटापिटा या बलात्काराच्या घटनेबाबत विरोध नोंदविण्यासाठी झाला असता तर बलात्कारी वृत्तींवर धाक बसला असता. मलकापुरात कुमारिकेवरील बलात्काराच्या प्रकरणात अपवाद वगळता साधा निषेधही कुणी नोंदविला नाही. दिल्लीसारखीच मलकापुरातही लेकबाळ सुरक्षीत नाही हे या घटनेवरुन स्पष्ट होते. विशेष म्हणजे ३३ टक्के आरक्षणाकरिता महिलांचे विविध सेल पुढे येतात इथे मात्र गप्प कशासाठी? चार-दोन वाईट प्रवृत्तीमुळे इमानदार ऑटोचालकांवर प्रश्नचिन्ह नको परंतु अँटो चालकांनीही अशा घटनेचा निषेध नोंदवू नये का?पोलिसांचा पाठपुरावा व न्यायालय त्या नराधमांना शासन करेलच यात शंका नाही. मात्र बोथट झालेल्या स्थानिक समाजभावनेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.