शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

..तर जिल्हा परिषदेत नवी राजकीय आघाडी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST

राजेश शेगाेकार अकाेला : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भाेजने ...

राजेश शेगाेकार

अकाेला : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भाेजने यांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या राजीनाम्यानंतर राजकारणात सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जिल्हा परिषदेत सत्तेचा साेपान कायम ठेवायचा असेल तर आकड्यांच्या खेळात सध्या वंचित बहुजन आघाडी काठावर आहे. त्यामुळे गेल्या वेळी भाजपाच्या अप्रत्यक्ष साथीने एकहाती सत्ता स्थापन करणाऱ्या वंचितच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा भाजपच्या हाती गेल्या आहेत. जर भाेजने यांचा राजीनामा स्वीकारला गेलाच तर अध्यक्षपदासाठी नव्याने निवडणूक घ्यावी लागेल. अशा वेळी भाजपाची प्रत्यक्ष साथ घेणार की काँग्रेस, राष्ट्रवादीला साेबत घेणार या गणिताची आकडेमाेड आता सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेत आताची सत्ता स्थापन करतेवेळी भाजपचे सदस्य अनुपस्थित राहिल्याने वंचितची सत्ता आली, या सत्ताधाऱ्यांवर वाॅच ठेवण्यासाठी वंचितने एक तीन सदस्यांची समिती गठित केली. मात्र जिल्हा परिषदेतील कामकाजावर कुणाचेही नियंत्रण राहिले नाही. प्रशासकीय अडचणी वाढतच गेल्या शिवाय योजनांची मनमानी अंमलबजावणी, निधीचे वाटप करतांना पाहली जाणारी राजकीय साेयसुद्धा दुर्लक्षित झाल्याने पक्षातून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांविरोधात रोष वाढत गेला त्याची दखल घेत. खुद्द आंबेडकर यांनी एकाच महिन्यात दाेनदा कडक भाषेत इशाराही दिल्याची माहिती आहे मात्र कारभारात बदल हाेतांना न दिसल्याने अखेर राजीनामा घ्यावा लागला. या पृष्ठभूमीवर आता पुढे काय याची चर्चा हाेणे स्वाभाविकच आहे. हा राजीनामा स्वीकारला गेला तर नव्याने हाेणारी निवडणूक वंचितसाठी माेठ्या अडचणीची ठरू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबतच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील ५३ पैकी १४ जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांमध्ये सर्वाधिक आठ सदस्य वंचित बहुजन आघाडीचे आहेत. सध्या अकोला जिल्हा परिषदेचे एकूण संख्याबळ ३९ वर आलं आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेतील सध्याच्या संख्याबळानुसार वंचित बहुजन आघाडी अल्पमतात आहे. त्यामुळे हा राजीनामा स्वीकारला गेला तर अकोला जिल्हा परिषदेत नव्या राजकीय आघाडीला जन्म दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही आघाडी कशी असेल यावरच जिल्हा परिषदेतीलच राजकारणाची दिशा ठरणार आहे. वंचित, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस असा एक पर्याय आहे मात्र यामध्ये राष्ट्रवादी आणी वंचितमध्ये असलेल्या विराेधाचा अडसर आहे. काॅंग्रेसची सदस्य संख्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त असल्याने जिल्हा परिषदेती पदांचे विभाजन हा कळीचा मुद्दा ठरू शकताे त्यामुळे वंचित आणी शिवसेनेत असलेल्या टाेकाचा विराेध लक्षात घेता भाजपासाेबत थेट आघाडीचा एक पर्याय आंबेडकर यांच्यासमाेर आहे मात्र त्याचा स्वीकार केल्यास वंचितवर भाजपाची ‘बी’ टीम असल्याचा हाेणारा आराेप खरा असल्याचे भांडवल काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस पुरव्यासह करणे शक्य आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा भाजपची ‘गैरहजेरी’ वंचितच्या पथ्यावर पडू शकते. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेत राजकीय काेलांटउड्या मारून सत्ता टिकवायची की भाेजने यांच्यावर दबाव वाढविण्यासाठी राजीनामा घेण्याचे धक्कातंत्र वापरण्यात आले, याचे उत्तर पुढील काही दिवसात समाेर येईलच. सध्या तरी ज्या पदाधिकाऱ्यांचे पद वाचले आहे त्यांच्यावर टांगती तलवार कायमच आहे.

आताची स्थीती

एकूण जागा : 39

वंचित बहुजन आघाडी : 16

शिवसेना : १२

भाजप : ०४

काँग्रेस : 03

राष्ट्रवादी : 02

अपक्ष : 02