शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

राज्यात आतापर्यंत केवळ १६ टक्केच रब्बीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:22 IST

ही परिस्थिती बघता रब्बी हंगाम तीन आठवडे पुढे जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: मान्सून उशिरा पोहोचल्याने यावर्षी खरीप हंगाम उशिरा सुरू झाला. परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पेरणीसाठीच्या मशागतीची कामे आता सुरू झाली असून, आजमितीस राज्यात ९ लाख हेक्टर, १६ टक्केच पेरणी झाली. ही परिस्थिती बघता रब्बी हंगाम तीन आठवडे पुढे जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे. गत काही वर्षांत पावसाच्या अनिश्चिततेमुळे राज्यात रब्बीची पेरणी घटली होती. यावर्षी पूरक पाऊस पडला; परंतु हा पाऊस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही पडल्याने रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी शेताची मशागत करण्यास शेतकऱ्यांना वेळ लागत आहे. राज्यासह विदर्भातील परिस्थिती रब्बी पेरणीसाठी अद्याप पूरक नसल्याचे चित्र आहे.दरम्यान,पीक काढल्यानंतर लगेच काढता येत नाही त्याला दोन एक दिवस शेतात ठेवावे लागते,शिवाय काढणीसाठी लागणारे मळणी यंत्रही वेळेवर मिळत नाही.अशातच ओडिशा राज्यात आलेल्या ‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे विदर्भातही पाऊस येतोय का, या भीतीने शेतकऱ्यांनी पीक कापणी थांबविली होती. त्यामुळे अनेक भागातील शेतकºयांनी आता सोयाबीन व ज्वारी काढणी सुरू केली आहे.विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी सहा लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात आतापर्यंत १ लाख ६० हजार हेक्टर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभरा पेरणीवर शेतकºयांनी भर दिला आहे. यावर्षी धरणांमध्ये मुबलक जलसाठा असल्याने गव्हाचे क्षेत्रही वाढणार आहे. नागपूर विभागात गतवर्षी ४ लाख ११ हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले होते. पेरणी ३ लाख ५५ हेक्टरवर झाली होती. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. यानुषंगाने कृषी विभागाने ४,११८.०९ हेक्टरचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत २९ हजार ७३ हेक्टर म्हणजेच ७.२३ टक्केच पेरणी झाली आहे.

अवेळी व परतीचा पाऊस लांबल्याने शेतकºयांना पीक काढणी करता आली नाही. पावसाने उसंत दिल्यानंतर ही कामे सुरू झाली आहेत. आता मशागतीच्या कामांना वेळ लागणार असल्याने यावर्षी दोन ते तीन आठवडे रब्बी हंगाम पुढे जाणार आहे.- सुभाष नागरे,विभागीय कृषी सहसंचालक,अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती