शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आतापर्यंत केवळ १६ टक्केच रब्बीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:22 IST

ही परिस्थिती बघता रब्बी हंगाम तीन आठवडे पुढे जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: मान्सून उशिरा पोहोचल्याने यावर्षी खरीप हंगाम उशिरा सुरू झाला. परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पेरणीसाठीच्या मशागतीची कामे आता सुरू झाली असून, आजमितीस राज्यात ९ लाख हेक्टर, १६ टक्केच पेरणी झाली. ही परिस्थिती बघता रब्बी हंगाम तीन आठवडे पुढे जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे. गत काही वर्षांत पावसाच्या अनिश्चिततेमुळे राज्यात रब्बीची पेरणी घटली होती. यावर्षी पूरक पाऊस पडला; परंतु हा पाऊस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही पडल्याने रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी शेताची मशागत करण्यास शेतकऱ्यांना वेळ लागत आहे. राज्यासह विदर्भातील परिस्थिती रब्बी पेरणीसाठी अद्याप पूरक नसल्याचे चित्र आहे.दरम्यान,पीक काढल्यानंतर लगेच काढता येत नाही त्याला दोन एक दिवस शेतात ठेवावे लागते,शिवाय काढणीसाठी लागणारे मळणी यंत्रही वेळेवर मिळत नाही.अशातच ओडिशा राज्यात आलेल्या ‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे विदर्भातही पाऊस येतोय का, या भीतीने शेतकऱ्यांनी पीक कापणी थांबविली होती. त्यामुळे अनेक भागातील शेतकºयांनी आता सोयाबीन व ज्वारी काढणी सुरू केली आहे.विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी सहा लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात आतापर्यंत १ लाख ६० हजार हेक्टर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभरा पेरणीवर शेतकºयांनी भर दिला आहे. यावर्षी धरणांमध्ये मुबलक जलसाठा असल्याने गव्हाचे क्षेत्रही वाढणार आहे. नागपूर विभागात गतवर्षी ४ लाख ११ हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले होते. पेरणी ३ लाख ५५ हेक्टरवर झाली होती. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. यानुषंगाने कृषी विभागाने ४,११८.०९ हेक्टरचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत २९ हजार ७३ हेक्टर म्हणजेच ७.२३ टक्केच पेरणी झाली आहे.

अवेळी व परतीचा पाऊस लांबल्याने शेतकºयांना पीक काढणी करता आली नाही. पावसाने उसंत दिल्यानंतर ही कामे सुरू झाली आहेत. आता मशागतीच्या कामांना वेळ लागणार असल्याने यावर्षी दोन ते तीन आठवडे रब्बी हंगाम पुढे जाणार आहे.- सुभाष नागरे,विभागीय कृषी सहसंचालक,अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती