शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

साहेब , हाेते नव्हते ते सर्वच गेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST

अकाेला : पहिल्यांदाच घरात पाणी शिरले, सगळे वाहून गेले, आहे ते भिजले, रात्रभर घरातील पाणी काढत हाेताे, एकही काेरडा ...

अकाेला : पहिल्यांदाच घरात पाणी शिरले, सगळे वाहून गेले, आहे ते भिजले, रात्रभर घरातील पाणी काढत हाेताे, एकही काेरडा कपडा राहिला नाही, आभाळच फाटले अशा शब्दात पूरग्रस्त कुटुंबांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे व्यथा मांडली.

दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने संपूर्ण अकोला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर जोरदार हजेरी लावली. ढगफुटीसदृश पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला. मोर्णा व विद्रुपा नद्यांना मोठा पूर आल्याने अकोला शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. काही भागात नाल्यांनीही रौद्रावतार धारण केल्याने अकोला शहरातील मोठा भाग जलमय झाला होता. खडकी, न्यू खेतान नगर, कौलखेड, गीतानगर, जुने शहर, डाबकी रोड, अनिकट, बाळापूर नाका या भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरे आणि घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले. पुरामुळे अनेक वस्त्यांमधील नागरिकांना रात्रभर जीव मुठीत धरून काढावी लागली. या पैकी न्यू खेतान नगर, ड्रीमलँड कॉलनी, खडकी, शिवसेना वसाहत, रिधोरा या परिसरात शुक्रवारी पालकमंत्री बच्च कडू यांनी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली तसेच पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्या. अनेक नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी अनेक महिला आणि नागरिकांना अडचणी मांडताना अश्रू अनावर झाले. पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामा आणि पंचनाम्याचे आदेश दिलेत.

जिल्हाधिकारी यांचे वाहन अडविले

जिल्हाधिकारी निमा अराेरा या पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी आल्या असता खेतान नगर परिसरात पाहणीसाठी गेल्या असता तेथील महिलांनी जिल्हाधिकारी यांच्या गाडीसमोर येऊन त्यांना गाडी थांबवायला लावली. यावेळी संतप्त महिलांनी आपल्या व्यथांना वाट माेकळी करून दिली. जिल्हाधिकारी अराेरा यांनी पूरग्रस्तांचे म्हणणे ऐकून मदतीचे आश्वासन दिले.

हरबऱ्याला आले काेंब

न्यू खेतान नगर येथील ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील हरबरे, तूर ओली झाली. या कडधान्याचे पाेते दाेन दिवस पाण्यात राहिल्याने धान्याला काेंब आले. घरातील सर्व साहित्य पाण्यात भिजल्याने या कुटुंबाची माेठी आर्थिक हानी झाली आहे.