शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

४५ काेटींच्या घनकचरा प्रकल्पाला ग्रहण लागण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत सन २०१५ पासून केंद्र शासनाकडून महापालिकेला वर्षाकाठी काेट्यवधींचा निधी प्राप्त हाेत आहे. या प्राप्त निधीतून मनपाने ...

‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत सन २०१५ पासून केंद्र शासनाकडून महापालिकेला वर्षाकाठी काेट्यवधींचा निधी प्राप्त हाेत आहे. या प्राप्त निधीतून मनपाने साफसफाइच्या उपाययाेजनांवर केलेला खर्च पाहता केंद्राच्या निधीची निव्वळ उधळपट्टी केली जात असल्याचे दिसत आहे. असाच काहीसा प्रकार मनपा प्रशासनाने घनकचऱ्यावर उभारल्या जाणाऱ्या ४५ काेटींच्या प्रकल्पासंदर्भात केल्याचे समाेर आले असून, याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारण्यात सत्ताधारी भाजप आग्रही नसल्याची स्थिती आहे. प्रभाग क्रमांक १ मधील नायगाव येथे मनपाचे डम्पिंग ग्राउंड असून, याठिकाणी साठवणूक केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर काेणतीही प्रक्रिया हाेत नसल्याने परिसरातील जलस्रोत दूषित झाले असून, दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. रहिवासी परिसरातील कचरा संकलन केंद्र हटविण्याच्या उद्देशातून मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१६ मध्ये भाेड गावानजिकच्या १९ एकर इ-क्लास जमिनीची निवड करण्यात आली. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी देत २०१७ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाेड येथील उपराेक्त जागेची पाहणी करण्यात आली. त्यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालात याठिकाणी माेठी खदान असून, त्यातून गाैण खनिजाचे उत्खनन झाल्याचे नमूद करण्यात आले हाेते, हे येथे उल्लेखनिय.

२०० टन नव्हे १०० टन कचरा!

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरातून दरराेज किमान २०० टन किंवा त्यापेक्षा अधिक कचऱ्याचे संकलन हाेणे आवश्यक आहे. या मुद्यावर प्रशासनाकडून शासनाची व काही कंपन्यांची दिशाभूल करीत शहरात २०० टनपेक्षा अधिक कचरा जमा हाेत असल्याची माहिती दिली. वास्तविक पाहता दरराेज १०० टनही कचऱ्याचे संकलन हाेत नसल्याची माहिती आहे, यामुळे प्रकल्प कार्यान्वित झाला तरी त्याची कचऱ्याची गरज कशी भागणार, हा माेठा प्रश्न आहे.