शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘बीडीओं’ना कारणे दाखवा नोटिस

By admin | Updated: May 27, 2017 00:55 IST

लेखा परीक्षणास ग्रामपंचायतींचे अभिलेखे देण्यात दिरंगाई!

संतोश येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ग्रामपंचायतींच्या निधीचे अभिलेखे लेखा परीक्षणास उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने, यासंदर्भात अनुपालन अहवाल सादर करण्याच्या कामात दिरंगाई केल्यामुळे जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.लेखा परीक्षणासाठी जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतींकडून ग्रामपंचायत अभिलेखे, सामान्य निधी व अन्य निधीचे अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आले नाही. यासंदर्भात सन २०११-१२ मध्ये पंचायत राज समितीने आक्षेप नोंदविला होता. या पृष्ठभूमीवर योजनानिहाय ग्रामपंचायतींच्या सामान्य निधी, जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना तसेच संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनासंबंधी सद्यस्थितीचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) देण्यात आले होते. वारंवार निर्देश देण्यात आल्यानंतर अद्यापही ‘बीडीओं’कडून अनुपालन प्राप्त झाले नाही. एवढेच नाही तर जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांकडून लेखा परीक्षणासाठी ग्रामपंचायत अभिलेखे अद्यापही उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यानुषंगाने लेखा परीक्षणासाठी ग्रामपंचायतींची अभिलेखे उपलब्ध करून न देणे आणि यासंदर्भात अनुपालन अहवाल सादर करण्याच्या कामात जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुहे यासंदर्भात नियम १९७९ नुसार शिस्तभंगविषयक कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटिस जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी गत ११ मे रोजी जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना बजावली आहे. नोटिस मिळाल्यानंतर तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेशही नोटिसमध्ये देण्यात आला आहे.लेखा परीक्षणासाठी अद्यापही अभिलेखे न दिलेल्या अशा आहेत ग्रामपंचायती!लेखा परीक्षणासाठी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींंच्या ग्रामसेवकांकडून अद्यापही अभिलेखे उपलब्ध करून दिले नाही. त्यामध्ये दुधाळा, कौलखेड जहागीर, कंचनपूर, शिवणी, लोणाग्रा, धामणा, चिखलगाव, कापशी, रिधोरा, दधम, बारलिंगा, जोगलखेड, मनारखेड, खामखेड, खिरपुरी खुर्द, जलालाबाद, भेंडीसूत्रक, खेर्डा, वडगाव, जामवसू, बोर्टा, लोणसना, शेलू नजीक, दातवी, विरवाडा, कवठा सोपीनाथ, निंभा, कंझरा, शेकापूर,गावंडगाव, सिरसोली व शिवाजी नगर (तेल्हारा) इत्यादी ग्रामपंचायतींच्या संबंधित ग्रामसेवकांकडून लेखा परीक्षणासाठी अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आले नाही.लेखा परीक्षणासाठी ग्रामपंचायतींची अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आली नाही आणि यासंदर्भात अनुपालन अहवाल सादर करण्याच्या कामात दिरंगाई केल्याने, जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या ‘बीडीओं’ना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली असून, तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. स्पष्टीकरण समाधानकारक प्राप्त न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.- डॉ. सुभाष पवारप्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद