शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

मंदिरे उघडायला हवीत का? काेणत्या पक्षाला काय वाटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:40 IST

अकोला : कोरोनामुळे दुसऱ्यांदा मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. आता निर्बंध शिथिल झाली असून, सर्वच व्यवसाय सुरू झाले आहेत; ...

अकोला : कोरोनामुळे दुसऱ्यांदा मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. आता निर्बंध शिथिल झाली असून, सर्वच व्यवसाय सुरू झाले आहेत; मात्र जिल्ह्यातील मंदिरे अद्यापही बंद आहेत. त्यामुळे मंदिर सुरू करण्यात यावी अशी मागणी जाेर धरत आहे. भारतीय जनता पक्षाने मंदिरे सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका घेऊन राज्यभर शंखनाद आंदाेलनही केले त्यामुळे या मुद्याला राजकीय वळण मिळू लागले आहे. या पृष्ठभूमीवर सर्व राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेतली असता मंदिरे सुरू करण्याबाबत एकमत दिसून आले नाही.

राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा वृद्धीदर कमी आहे, अशा जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. वेळेचे बंधनही कमी करण्यात आले आहे. असे असले तरी अद्याप भक्तांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे बंद आहेत. मंदिरांमध्येही गर्दी टाळण्यासाठी त्या संदर्भात स्वतंत्र आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे आपल्या आराध्यदैवताचे दर्शन करण्यासाठी भाविक मंदिरात जातात; परंतु मंदिर बंद असल्याने गेटजवळ नतमस्तक होऊन परत जातात. यामुळे मंदिर परिसरात असलेल्या व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

काेराेना परतल्यावर मंदिर उघडावीत शिवसेना

मंदिर उघडण्याची मागणी सामान्य लाेकांची नाही. केवळ राजकीय हेतूने मागणी केली जाते. काेराेनाचा उद्रेक लक्षात घेता सरकारने नियमावली केली आहे. त्यानुसार मंदिरेही उघडली जातील. आपली सर्वांची श्रद्धा घरातील मंदिरांवरच आहे. काेराेनाचे संकट परतले की मंदिरेही उघडतील यात शंकाच नाही.

आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना

सर्वच सुरू, मग मंदिरे बंद का?- भाजप

काेराेनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यातील सर्वच निर्बंध उठविले आहेत, केवळ शाळा व मंदिरे बंद आहेत. आता सण, उत्सव सुरू आहेत. अशा प्रसंगी किमान काेराेनाचे नियम पाळून मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे, हवे तर काेराेनाेच्या उद्रेकानुसार वर्गवारी करून मंदिरे उघडण्याबाबत नियमावली करावी.

आ. रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष भाजप

याेग्य वेळी मंदिरांबाबतही निर्णय- काॅंग्रेस

मंदिरे उघडलीच पाहिजेत यात दुमत नाही मात्र काेराेनाचे संकट संपले नाही, डेल्टासारखे आजार डाेके वर काढत आहेत. अशा स्थितीत निर्बंध उठविण्याचा प्रत्येक निर्णय हा संभाव्य धाेका ओळखून घेतला जाताे. आघाडी सरकार याबाबत निश्चित विचार करून याेग्यवेळी निर्णय घेईल, अशी खात्री आहे.

अशाेक अमानकर, जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस

काेराेनाचा धाेका ओळखून निर्णय व्हावा

मंदिरे ही आपले श्रद्धास्थान आहेत, त्यामुळे आता सर्वच खुले हाेत असताना मंदिरेही खुली व्हावीत असे वाटणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री व आराेग्यमंत्री राज्याच्या काेराेना टास्क फाेर्ससाेबत चर्चा करून याेग्य वेळी निर्बंध शिथिल करण्याची भूमिका घेताना दिसले आहेत त्यामुळे मंदिरांबाबतही याेग्य परिस्थितीचा अंदाज घेतला जाईल असे वाटते.

संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस

प्रसंगी आंदाेलनाची भूमिका घेऊ-वंचित

राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती आता नियंत्रणात आहे. त्यामुळे पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच राज्यातील इतर मंदिरे व प्रार्थना स्थळे सुरू करण्यात यावीत, अशी मागणी आम्ही या आधीच केली आहे. ती कायमच असून प्रसंगी गेल्यावेळी केलेल्या आंदाेलनाप्रमाणे भूमिका घेणार आहाेत.

डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी