शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

चाचणी केंद्रांवर टेस्टिंग किटचा तुटवडा; व्यापाऱ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:17 IST

अकाेलेकरांच्या बेफिकिरीमुळे काेराेनाच्या प्रादूर्भावात झपाट्याने वाढ झाल्यामुळे जिल्हाप्रशासनाने २३ फेब्रुवारी पासून जिल्ह्यासह शहरात लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. व्यापार ठप्प हाेण्याच्या ...

अकाेलेकरांच्या बेफिकिरीमुळे काेराेनाच्या प्रादूर्भावात झपाट्याने वाढ झाल्यामुळे जिल्हाप्रशासनाने २३ फेब्रुवारी पासून जिल्ह्यासह शहरात लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. व्यापार ठप्प हाेण्याच्या धास्तीने व्यापाऱ्यांनी दुकाने खुली करण्याची परवानगी मागितली असता जिल्हाप्रशासनाने काेविड चाचणी बंधनकारक केली. अर्थात व्यापारी व कामगारांची संख्या लक्षात घेता चाचणीसाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने चाचणी केंद्रांची संख्या वाढवून टेस्टिंग किट उपलब्ध करून देणे अपेक्षित हाेते. तसे न करता व्यावसायिकांवर कारवाइचा बडगा उगारला.

अवघ्या तीन तासांत गाशा गुंडाळला!

व्यापारी व कामगारांना काेविड चाचणी बंधनकारक केल्यामुळे चाचणी केंद्रांसमाेर शुक्रवारी व शनिवारी व्यापाऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या. शनिवारी मनपाच्या चाचणी केंद्रांवर टेस्टिंग किट संपल्याने अवघ्या तीन तासांत गाशा गुंडाळल्याचे समाेर आले. अनेक चाचणी केंद्रांवर किमान १०० व त्यापेक्षा अधिक किट उपलब्ध असताना त्याठिकाणी किमान ७०० ते ८०० व्यापाऱी व कामगारांनी गर्दी केल्याचे चित्र हाेते. गीता नगरमध्ये भर उन्हात व्यापारी,कामगार तासन् तास ताटकळत उभे हाेते.

नागरिक संतापले; अधिकाऱ्यांशी वाद

भाजपचे नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी पुढाकार घेऊन जवाहर नगर चाैकात चाचणी केंद्र सुरु केले. मनपाच्या वैद्यकीय पथकाकडे ५०० टेस्टिंग किट हाेत्या. परंतु पीपीइ किट घातलेल्या महिला कर्मचाऱ्याला उन्हाचा त्रास हाेऊ लागल्याने २०० नागरिकांची चाचणी केली. त्यामुळे रांगेतील नागरिकांनी नगरसेवकासह मनपा अधिकाऱ्यांसाेबत वाद घातला. जुने शहरातील कस्तुरबा रुग्णालयातही किट संपल्याने संतप्त नागरिकांनी आराेग्य कमर्चाऱ्यांसाेबत वाद घातला.

प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार

जिल्हा व मनपा प्रशासनाने सुरु केलेल्या चाचणी केंद्रांवर स्वॅब घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव हाेता. संगणकात नाेंदणी करण्यासाठी नागरी आराेग्य केंद्रांकडून मनपाला डाटा एन्ट्री ऑपरेटरची मागणी केली जात असताना मनपाकडून दुर्लक्ष केले जात आहे. रॅपिड अन्टिजेन टेस्ट केल्यानंतर अनेकांना अहवाल प्राप्त हाेत नसल्याची परिस्थिती आहे. अशास्थितीत व्यापाऱ्यांवर दबावतंत्र कशासाठी,असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यंत्रणांची उडाली धांदल

जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी डाॅ.निलेश अपार, मनपातर्फे प्रभारी आयुक्त डाॅ.पंकज जावळे यासंपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. परंतु प्रत्यक्षात चाचणी केंद्र सुरू केल्यानंतर या दाेन्ही यंत्रणांची धांदल उडाल्याची परिस्थिती असून यामध्ये नाहक व्यापारी वर्ग भरडल्या जात असल्याचे चित्र समाेर आले आहे.