शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

मूर्तिजापूर तालुक्यात महाबीज बियाण्यांचा तुटवडा; खरीप पेरणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST

तालुक्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला, परंतु तालुक्यातील काही भागांतच पेरणी योग्य पाऊस झाला आहे, तरीही शेतकरी ...

तालुक्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला, परंतु तालुक्यातील काही भागांतच पेरणी योग्य पाऊस झाला आहे, तरीही शेतकरी खरीप पेरणीसाठी सरसावले आहेत.

मूर्तिजापूर, कुरुम, शेलू बाजार मंडळात आतापर्यंत ७५ मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती मशागत तातडीने आटोपून पेरणीला सुरुवात केली असली, तरी संपूर्ण तालुक्यात आतापर्यंत केवळ ६८ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. आवश्यकतेनुसार संपूर्ण तालुक्यासाठी ३ हजार ५०० क्विंटल महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु ३ हजार १०० क्विंटल महाबीज बियाणे पुरविण्यात आले असल्याने प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे, तर खासगी कंपनीच्या ८ हजार ८०० क्विंटल मागणीनुसार पूर्तता झाली असली, तरी बाजारात सद्यस्थितीत कमी प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. भविष्यात महाबीज बियाणे बाजारात उपलब्ध होण्याची आशा मावळली असल्याने, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे उगवण शक्ती प्रक्रिया तपासून घेऊन व बीज प्रक्रिया करून बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. सद्यस्थितीत बाजारात महाबीज वगळता, इतर कंपन्यांचे सोयाबीन बियाणे केवळ ६०० क्विंटल बतियाने बाजारात उपलब्ध आहे. पिकांसाठी आवश्यक असलेले सर्व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने, शेतकऱ्यांची खताची चिंता मिटली आहे. हल्ली कुठलेही खत उपलब्ध आहे. एकूण ३ हजार टन खतसाठा आजमितीस आहे, तर त्या डीएपी ३७५ मेट्रिक टन असल्याने, शेतकऱ्यांची खतांची चिंता मिटली असली, तरी महाबीजचे बियाणे १२ टक्केच उपलब्ध झाल्याने व इतर बियाण्यांच्या किमतीपेक्षा स्वस्त असल्याने महाबीज बियाण्याची वाणवा होत आहे.

सोयाबीन, कपाशी, तुरीचा पेरा वाढणार

गतवर्षीच्या तुलनेत मूर्तिजापूर तालुक्यात यंदा सोयाबीन पिकाचा पेरा वाढणार आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, ३७ हजार २५६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता आहे. १७ हजार ७३६ हेक्टरवर कपाशी, १० हजार ६११ हेक्टरवर तूर, ५ हजार ३७६ हेक्टरवर मूग व ५४३ हेक्टरवर उडदाची लागवड होण्याचा अंदाज आहे. तालुक्यात सर्वात कमी १ हजार ८६५ हेक्टरवर ज्वारीची लागवड होण्याचा अंदाज आहे.

बियाण्यांचा तुटवडा; दुबार पेरणीचे संकट टाळा

बाजारात सोयाबीन बियाण्याची सुरुवातीलाच चणचण जाणवत असून, बाजारात मोजके बियाणे उपलब्ध आहे. पेरणी योग्य पाऊल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता, मुबलक पावसानंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. पेरणी योग्य पाऊस न झाल्यास पेरणी लुटण्याची दाट शक्यता असते. पेरणी उलटू नये, याची खबरदारी शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक असून, पेरणी उलटली तर दुबार पेरणीचे संकट आले, तर बाजारात बियाणे उपलब्ध राहणार नाही.

बियाणे ठेवा थोडे शिल्लक

शेतकऱ्यांनी बाजारात बियाणे खरेदी केले आहेत. त्या बियाण्याची उगवण शक्ती तपासून घेणे गरजेचे असून, घरी बीज प्रक्रिया करावी, जेणेकरून उगवणीस चांगली मदत होईल. त्याबरोबर, बॅगचे बियाणे असल्यास बॅगचे ‘लेबल’ कायम ठेवून बॅग खालच्या बाजूने फोडावी व त्यातील थोडे बियाणे शिल्लक ठेवावे. बियाणे उगवले नाही, तर जेणेकरून भविष्यात बियाणे कंपनीसोबत लढा देणे शक्य होईल.

बियाणे प्रक्रिया व बियाणे उगवणशक्ती तपासणीची प्रात्यक्षिके ग्रामीण विभागात देण्यात आली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी, तसेच ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करणे टाळावे.

- अमृता काळे

तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर

सद्यस्थितीत खासगी कंपनीचे बियाणे बाजारात उपलब्ध आहेत, महाबीजकडून केवळ १२ टक्केच बियाणे उपलब्ध झाले. त्यातल्या त्यात इतर बियाण्यांच्या किमतीत महाबीज शेतकऱ्यांना परवडणारे असल्याने, महाबीज बियाण्यांचा तुटवडा आहे. शेतकऱ्यांना लागणारे सर्व प्रकारची खते उपलब्ध आहेत.

- गोपाल बोंडे, कृषी अधिकारी पंचायत समिती, मूर्तिजापूर.