शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

धक्कादायक : अकोला  जिल्ह्यात ३१ दिवसांत ‘कोरोना’चे २८ बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 10:23 IST

गत ३१ दिवसांत कोरोनाने तब्बल २८ जणांचा बळी घेतला आहे.

ठळक मुद्देयातील १९ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा ५८१ वर पोहोचला आहे.

- प्रवीण खेतेअकोला : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांचा आकडा ५८१ वर पोहोचला आहे. गत ३१ दिवसांत कोरोनाने तब्बल २८ जणांचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे, यातील १९ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. आतापर्यंत एकूण ३२ जणांचा बळी गेला आहे.जिल्ह्याचा ‘रेड झोन’मध्ये प्रवेश झाल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शिवाय, मृत्यूदरही वाढला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी १४ एप्रिल रोजी गेला होता. तत्पूर्वी ११ एप्रिल रोजी ३१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने सर्वोपचार रुग्णालयात आत्महत्या केली होती. ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे केवळ चार बळी गेले होते; मात्र मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोनाने आणखी एक बळी घेतला. मृत्यूचे हे सत्र मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच राहिले. धक्कादायक बाब म्हणजे, मे महिन्यात दर दिवसाआड एकाचा बळी गेला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. १ ते ३१ मे या कालावधीत तब्बल २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील १९ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. ही चिंतेची बाब असून, वयोवृद्धांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.मृतांमध्येमहिला - १५पुरुष - १७

मृतकांना होते हे आजारकोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण हे ४० ते ८० वयोगटातील आहेत. यातील बहुतांश रुग्णांना उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह यासह निमोनिया आदी आजारांच्या समस्या होत्या. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वच वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण झालेली आहे. मृतकांमध्ये ५० पेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त असून, त्यांना इतरही आजारांच्या समस्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या