शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेला कानमंत्र

By admin | Updated: January 7, 2017 02:34 IST

अकोला मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुंबईत शिवसेनेची बैठक.

अकोला, दि. ६- महापालिकेच्या निवडणुकीत गाफील न राहता पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या प्रामाणिक, सक्षम व निष्ठावान कार्यकर्त्यांंना उमेदवारी देण्याचा कानमंत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबई येथे रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर ज्या मनपा क्षेत्रात निवडणुका होतील त्या ठिकाणच्या जिल्हाप्रमुखांना निवडणुकीच्या संदर्भात पक्षप्रमुखांनी कानमंत्र दिल्याची माहिती आहे. राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसह महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुंबईत शिवसेनेच्यावतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीपूर्वी शिवसेनेच्या राज्यभरातील संपर्क प्रमुखांनी पक्षाची जिल्हानिहाय माहिती सादर केल्याचे बोलल्या जात आहे. यामध्ये नगरपालिका निवडणुकीचा निकाल व पदाधिकार्‍यांच्या कामकाजाचादेखील समावेश होता. ५ जानेवारी रोजी रंगशारदा सभागृहात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची वाटचाल कशी राहील, या विषयावर पदाधिकार्‍यांना संबोधित केले. महाराष्ट्रात ज्यांना बोट धरून चालविण्यास शिकविले त्यांनीच कालांतराने शिवसेनेचा कसा घात केला, यावर पक्ष प्रमुखांनी नैसर्गिक मित्र पक्षाला चिमटे काढले. २0१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत युतीच्या मुद्यावरून निर्माण झालेला शिमगा कसा विसरता येईल, असे सांगत जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या निवडणुकीत गाफील न राहता पदाधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. युतीच्या मुद्यावर संभ्रमावस्थाशिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी तातडीने बोलावलेल्या आढावा बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाज पसोबत युती करणार किंवा नाही, यासंदर्भात पक्ष प्रमुख संकेत देतील, अशी पदाधिकार्‍यांना अपेक्षा होती. तसे कोणतेही संकेत उद्धव ठाकरे यांनी न दिल्यामुळे युतीच्या मुद्यावर संभ्रमावस्था कायम असल्याचे चित्र आहे.दबावतंत्र झुगारा!महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी पक्षाच्या निष्ठावान, प्रामाणिक व सक्षम कार्यकर्त्यांंना उमेदवारी देण्याकडे लक्ष द्या. केवळ दुकानदारीचे उद्दिष्ट समोर ठेवून मर्जी तल्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी पक्षावर दबावतंत्राचा वापर करणार्‍यांना थारा देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.