शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेला कानमंत्र

By admin | Updated: January 7, 2017 02:34 IST

अकोला मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुंबईत शिवसेनेची बैठक.

अकोला, दि. ६- महापालिकेच्या निवडणुकीत गाफील न राहता पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या प्रामाणिक, सक्षम व निष्ठावान कार्यकर्त्यांंना उमेदवारी देण्याचा कानमंत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबई येथे रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर ज्या मनपा क्षेत्रात निवडणुका होतील त्या ठिकाणच्या जिल्हाप्रमुखांना निवडणुकीच्या संदर्भात पक्षप्रमुखांनी कानमंत्र दिल्याची माहिती आहे. राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसह महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुंबईत शिवसेनेच्यावतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीपूर्वी शिवसेनेच्या राज्यभरातील संपर्क प्रमुखांनी पक्षाची जिल्हानिहाय माहिती सादर केल्याचे बोलल्या जात आहे. यामध्ये नगरपालिका निवडणुकीचा निकाल व पदाधिकार्‍यांच्या कामकाजाचादेखील समावेश होता. ५ जानेवारी रोजी रंगशारदा सभागृहात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची वाटचाल कशी राहील, या विषयावर पदाधिकार्‍यांना संबोधित केले. महाराष्ट्रात ज्यांना बोट धरून चालविण्यास शिकविले त्यांनीच कालांतराने शिवसेनेचा कसा घात केला, यावर पक्ष प्रमुखांनी नैसर्गिक मित्र पक्षाला चिमटे काढले. २0१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत युतीच्या मुद्यावरून निर्माण झालेला शिमगा कसा विसरता येईल, असे सांगत जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या निवडणुकीत गाफील न राहता पदाधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. युतीच्या मुद्यावर संभ्रमावस्थाशिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी तातडीने बोलावलेल्या आढावा बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाज पसोबत युती करणार किंवा नाही, यासंदर्भात पक्ष प्रमुख संकेत देतील, अशी पदाधिकार्‍यांना अपेक्षा होती. तसे कोणतेही संकेत उद्धव ठाकरे यांनी न दिल्यामुळे युतीच्या मुद्यावर संभ्रमावस्था कायम असल्याचे चित्र आहे.दबावतंत्र झुगारा!महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी पक्षाच्या निष्ठावान, प्रामाणिक व सक्षम कार्यकर्त्यांंना उमेदवारी देण्याकडे लक्ष द्या. केवळ दुकानदारीचे उद्दिष्ट समोर ठेवून मर्जी तल्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी पक्षावर दबावतंत्राचा वापर करणार्‍यांना थारा देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.