शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

माहिती पत्रिकेवरून शिवसेनेचे नेते गायब

By admin | Updated: September 10, 2015 02:19 IST

अकोला मनपात सत्ताधा-यांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी.

अकोला: महापौर उज्ज्वला देशमुख यांनी तयार केलेल्या माहिती पत्रिकेवर भाजप नेत्यांची प्रकाशित छायाचित्रे वगळता, मित्र पक्ष शिवसेनेच्या एकाही नेत्याला स्थान देण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. विकास कामांचे श्रेय लाटण्यावरून भाजपने नेहमीच शिवसेनेवर कुरघोडी केली. हा प्रकार यावेळी पुन्हा दिसून आल्याने सत्ताधार्‍यांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे. मनपात १0 सप्टेंबर २0१४ रोजी सत्तापरिवर्तन होऊन शिवसेना-भाजपने सत्तेची सूत्रे स्वीकारली. केंद्र व राज्यात युतीचे सरकार असले तरी भाजपने मंत्रिमंडळात दुय्यम दर्जाची खाती दिल्यामुळे शिवसेनेत असंतोषाचे वातावरण आहे. शिवसेनेला वेळोवेळी नामोहरम करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असून, ही धग मनपातही कायम असल्याचे चित्र आहे. १५ कोटींच्या अनुदानातून १८ रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वी सिव्हिल लाइन रस्त्याचा भूमिपूजन सोहळा घेण्यात आला होता. त्यावेळी उपमहापौर विनोद मापारी यांची प्रतीक्षा न करताच, भाजप नेत्यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपून घेतला. मध्यंतरी भाजपमधील अंतर्गत वाद मिटल्यानंतर महापौर उज्ज्वला देशमुख, विजय अग्रवाल तसेच पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पाणीपुरवठय़ासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्तीच्या मुद्यावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये शिवसेनेला निमंत्रण नव्हते, हे येथे उल्लेखनीय. यानंतर भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेमध्ये चांगलीच खलबते झाली. युतीच्या सत्तास्थापनेला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्यामुळे महापौर उज्ज्वला देशमुख यांनी ३६५ दिवसांचा लेखाजोखा सादर केला. माहिती पत्रिकेवर भाजप नेत्यांची छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली, तर सेनेच्या एकाही नेत्याला स्थान देण्यात आले नाही. या प्रकारावर उपमहापौर विनोद मापारी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

शिवसेनेचे चुकते कोठे?

विधानसभा निवडणुकीत शिवसेना युतीसाठी अनुकूल असताना युती होऊ शकली नाही. निवडणुकीनंतर मात्र पुन्हा शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यात आली. मनपातही सत्तेचे समीकरण जुळविताना सर्वात विश्‍वासू मित्र म्हणून सेनेला सोबत घेतले, तर दुसरीकडे मात्र विविध मुद्यांवर सेनेला डावलण्याचे धोरण कायम असल्याने सेनेचे चुकते कोठे, असा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात निर्माण होत आहे.

विधान परिषदेसाठी भाजपची तयारी?

       नोव्हेंबर महिन्यात विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक पार पडेल. भाजप-सेनेच्या पक्ष श्रेष्ठींकडून युतीबाबत कोणतेही भाष्य होत नसताना स्थानिक पातळीवर मात्र भाजपकडून रणशिंग फुंकल्या जात आहे. भाजपच्या भूमिकेमुळे शिवसैनिक द्विधा मनस्थितीत सापडले आहेत.