शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शेगाव-पंढरपूर पालखी मार्ग खोदून ठेवल्याने चिखलमय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST

हातरुण : शेगाव-पंढरपूर राज्यमार्ग अंतर्गत येणाऱ्या शेगाव, निमकर्दा, गायगाव, वाडेगाव रस्त्याचे काम गत तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. ...

हातरुण : शेगाव-पंढरपूर राज्यमार्ग अंतर्गत येणाऱ्या शेगाव, निमकर्दा, गायगाव, वाडेगाव रस्त्याचे काम गत तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र, सद्या काम थंडबस्त्यात पडले आहे. हा पालखी मार्ग खोदून ठेवल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मार्गाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीपदादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी निवेदन सादर केले आहे.

या मार्गाहून हजारो भाविक शेगाव येथे संत गजानन महाराज यांचे दर्शनासाठी ये-जा करतात, तसेच वर्दळ सुरूच असते. परिसरातील नागरिकांसाठी मुख्य बाजारपेठ अकोला असल्यामुळे पातूर तालुका, बाळापूर तालुका, तेल्हारा तालुका, तसेच वाडेगाव येथील नागरिक अकोला येथे येतात. रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, रस्ता खोदून ठेवल्याने रस्त्यावर मातीच माती पसरली आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने वाहने घसरून अपघाताच्या घटना घडतात.

-----------------

...अन्यथा तीव्र आंदोलन

उन्हाळ्याच्या दिवसात या मार्गावर प्रवास करताना धुळीचा त्रास सहन करावा लागला.

पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर चिखल साचल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन या मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. पालखी मार्गाचे काम तातडीने सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना डॉ. अशोक ओळंबे, प्रा. अतुल पिलात्रे, रूपेश महल्ले उपस्थित होते.

-------------------------------

शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाचे काम सुरू होते, अन् बंद पडते. त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्यात या रस्त्याने ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. खोदून ठेवलेला हा मार्ग अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी मुहूर्ताची वाट पाहू नका. दुर्दशा झालेल्या या चिखलमय मार्गाची बांधकाम विभागाने पाहणी करावी.

- नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर.

----------------

शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाचे काम १५ दिवसांत सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल. पालखी मार्गाचे काम बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे काम तातडीने सुरू करावे.

- संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, शिवसंग्राम.