शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पश्‍चिम व-हाडात शेडनेटची लागली ‘वाट’

By admin | Updated: June 2, 2015 02:46 IST

४ वर्षात उभे झाले १८0 हरितगृह : शेतक-यांना योग्य मार्गदर्शनाची प्रतिक्षा.

सुनील काकडे /वाशिम : पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीनही जिल्ह्यांमध्ये हरितगृहांची (शेडनेट) अक्षरश: वाट लागली आहे. २0११ ते २0१५ या ४ वर्षाच्या काळात उभ्या झालेल्या उण्यापूर्‍या १८0 शेडनेटपैकी आजमितीस अध्र्यापेक्षा अधिक शेडनेट उध्वस्त झाल्याचे विदारक वास्तव आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असणार्‍या पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम या तीन्ही जिल्ह्यांकडे शासनाची पुर्वीपासूनच वक्रदृष्टी राहिलेली आहे. या भागातील शेतकर्‍यांना शेतीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत पुरेशी माहिती पुरविण्याकामी कृषी विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी आजही पारंपरिक पिकांच्या पेर्‍यातच गुरफटलेले आहेत. विपरित हवामानामुळे तीन्ही जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांना दरवर्षी असमानी-सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने कमी क्षेत्रात व प्रतिकुल परिस्थितीत शेतकर्‍यांना अधिक नफा मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरणारे शेडनेट तंत्रज्ञान अंमलात आणले. यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून १0 गुंठे क्षेत्रावर ह्यशेडनेटह्ण उभारण्याकरिता १ लाख ३५ हजार रुपये; तर २0 गुंठे क्षेत्रासाठी २ लाख ४५ हजार रुपये अनुदानासह शेडनेटमध्ये भाजीपाला लागवडीकरिता १0 गुंठे क्षेत्रासाठी ३९ हजार आणि २0 गुंठे क्षेत्रासाठी ७0 हजार रुपये शासनाकडून आर्थिक सहाय्य दिल्या जाते. जवळपास एवढाच निधी खचरून शेतकर्‍यांना आपल्या शेतात शेडनेट उभारता येते. या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात २0११ ते २0१५ या काळात ५५, बुलडाणा जिल्ह्यात ४६ आणि अकोला जिल्ह्यात ७९ असे १८0 शेडनेट उभारण्यात आले आहेत. प्रारंभीच्या काळात पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी उत्सुकतेपोटी हे तंत्रज्ञान आत्मसात करुन शेडनेटमध्ये कोथिंबीर, काकडी, ढोबळी मिरची, सिमला मिरची, कारली यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करुन समृद्धीकडे वाटचाल सुरु केली होती. मात्र, अवकाळी पाऊस, वादळी वारा यासह कृषी विभागाच्या योग्य मार्गदर्शनाअभावी तीन्ही जिल्ह्यांमधील १८0 पैकी अर्धेअधिक शेडनेट मोडून टाकण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील एकट्या मंगरुळपीर तालुक्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून तब्बल ३६ शेडनेट उभारण्यात आले होते. आजरोजी त्यातील बोटावर मोजण्याइतपत अर्थात ६ ते ७ शेडनेट सुस्थितीत आढळून येतात. कमी-अधिक प्रमाणात इतर जिल्ह्यांमधील तालुक्यांचीही हीच गत झाली आहे. कृषी विभागाच्या अनास्थेमुळेच शासकीय अनुदानासोबतच शेतकर्‍यांनी शेडनेटसाठी ओतलेला पैसा व्यर्थ गेल्याची वस्तूस्थिती आहे.

 *शेडनेटच्या अनुदानात वाढ

        २0१४-१५ पर्यंत १0 गुंठे आणि २0 गुंठे क्षेत्रावर उभारल्या जाणार्‍या शेडनेटह्णकरिता अनुक्रमे १ लाख ३५ हजार रुपये आणि २ लाख ४५ हजार रुपये अनुदान दिल्या जायचे. त्यात २0१५-१६ या वर्षापासून वाढ करण्यात आली आहे. यापुढे शेतकर्‍यांना १0 गुंठे क्षेत्राकरिता २ लाख ५४ हजार रुपये; तर २0 गुंठे क्षेत्रावर शेडनेटकरिता ४ लाख ५0 हजार ५६0 रुपये अनुदान दिले जाणार आहे.