शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सात वर्षांतील सिंचनाची शासनाला माहिती नाही!

By admin | Updated: March 27, 2017 02:54 IST

राज्याच्या आर्थिक पाहणीत माहिती उपलब्ध नसल्याची नोंद.

सदानंद सिरसाटअकोला, दि. २६- राज्यसरकारमध्ये विरोधात असताना सिंचनाच्या नावाने बोंब मारत श्‍वेतपत्रिका काढणार्‍या आताच्या सत्ताधार्‍यांना गेल्या सात वर्षांतील शेती सिंचन क्षेत्राची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब २0१६-१७ च्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आली आहे.शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे, असे गोलमाल उत्तर सातत्याने राज्यातील जनतेला दिले जात असताना महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात शेतीसाठी सिंचन सुविधांची पोलखोल केली आहे. राज्याच्या नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान २0१६-१७ चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये राज्याच्या सिंचनाखालील क्षेत्राच्या परिशिष्टात सिंचित क्षेत्राची माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. कृषी आयुक्तालयाने दिलेल्या माहितीचा आधार त्यासाठी घेतल्याची तळटीप आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार २0१0-११ ते २0१४-१५ या काळात राज्यातील सर्वच विहिरींची संख्या, सिंचनाची इतर साधने, त्यातून सिंचित झालेले निव्वळ क्षेत्र आणि एकूण क्षेत्राबाबतची माहिती उपलब्ध नसल्याचे दाखवण्यात आले आहे. तर सिंचन विहिरींची संख्या आणि त्यातून होणारे सिंचित जमिनीचे क्षेत्र याची माहिती, तर २00३-0४ पासून उपलब्ध नसल्याचे नमूद आहे. ही संपूर्ण माहिती राज्याच्या कृषी आयुक्तालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील किती शेतकर्‍यांना विविध साधनाद्वारे सिंचनासाठी पाणी मिळते. त्यातून किती शेती क्षेत्रावर सिंचन होते, ही बाब शासनालाच माहिती नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यातच उठता-बसता शासन शेतकरी हिताचा आव आणत आहे. त्याचवेळी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणते उपाय राज्यात होत आहेत, ही बाबही या अहवालातून स्पष्ट होत आहे.