शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

जिल्ह्यात एसटीच्या सात बस विजेवर धावणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:40 IST

अकोला : कोरोनाचे संकट आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ...

अकोला : कोरोनाचे संकट आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. अकोला विभागात अशा ७ बस विजेवर धावणार आहेत. पर्यावरणपूरक वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या निकाली निघेल. तसेच डिझेलच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे. इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या मोटरसायकल, ई-रिक्षांसोबतच आता महामंडळाच्या बसही धावणार आहेत. या बस काही महिन्यांनंतर सेवेत रुजू होतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी माहिती संकलित केली जात आहे.

या मार्गावर धावणार बस

अद्याप इलेक्ट्रिक बस प्रस्तावित आहे. अकोला-शेगाव, अकोला-बुलडाणा विभागांतर्गत मार्गावर सुरुवातीच्या काळात प्रायोगिक तत्त्वावर या बस धावतील, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. या बसची महामंडळातील कर्मचाऱ्यांसोबतच प्रवाशांनाही उत्सुकता लागून आहे.

आणखी सहा महिने लागणार

यासंदर्भात माहिती मागविण्यात आली असून, अकोला विभागातील ७ बसची माहिती पाठविण्यात आली आहे.

मात्र सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी या बस रस्त्यावर धावण्यास लागणार असल्याची माहिती आहे.

कारण या बसची खरेदी, त्यासाठी लागणारे चार्जिंग सेंटर याची निर्मिती करावी लागणार आहे.

कोठे होणार चार्जिंग सेंटर

या बससाठी चार्जिंग सेंटरची निर्मिती करावी लागणार आहे. सध्या ही योजना प्राथमिक स्तरावरच आहे.

त्यामुळे नेमके चार्जिंग स्टेशन कुठे राहणार याबाबत निश्चित नाही; परंतु अकोला आगारात शक्यता आहे.

त्याचप्रमाणे शेगाव येथेही चार्जिंग स्टेशन उभारण्याची शक्यता आहे. याचा फायदा अकोल्याला होईल.

खर्चात होणार बचत

विजेवर चालणाऱ्या एसटी बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर खर्चात बचत होणार आहे. सध्या बस चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च लागत आहे. या बसमुळे अडचणी कमी होतील. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होऊ शकतील. बसच्या चार्चिंगसाठी महत्त्वाच्या ठिकाणी चार्चिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

सात बसच्या ४८ फेऱ्या

अकोला विभागातील अकोला आगारातून या बस सोडण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये सर्वाधिक ५ बस अकोला-शेगाव मार्गावर सोडण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. या बसच्या ४० फेऱ्या तर अकोला-बुलडाणा या मार्गावर २ बसच्या ८ फेऱ्यांचे नियोजन आहे.