शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

शेतक-यांवर संकटाची मालिका

By admin | Updated: November 19, 2014 02:31 IST

कापसावर दहिया रोगाचा प्रकोप वाढतोय!

अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरू असून, खरीपातील सर्वच पिकांनी दगा दिल्यानंतर आता हाती येत असलेल्या कापसावरही दहिया या बुरशीजन्य रोगाचा प्रकोप वाढू लागला आहे. या रोगाचा नायनाट करण्यासाठी आता शेतकर्‍यांना खर्चात वाढ करणे क्रमप्राप्त असून, या चिंतेने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने मूग, उडीद पीक तर हातचे गेलेच, सोयाबीन यासह इतर खरीप पिकांचे उत्पादन घटले. शेतकर्‍यांची सर्व भिस्त कापूस या नगदी पिकावर होती. कापसाचे उत्पादनही घटले असून, त्यातच नव्याने दहिया या रोगाचा प्रकोप वाढू लागल्याने शेतकर्‍यांपुढे संकट उभे ठाकले आहे. एक एकर कपाशी पेरणीसाठी शेतकर्‍यांना येणारा खर्च १३ हजारांवर गेला आहे. यामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीवर जवळपास साडेचार हजार रुपये खर्च होतात. यावर्षी वातावरणात सारखा बदल होत गेल्याने कीटकनाशकांच्या फवारणीसाठी शेतकर्‍यांना अतिरिक्त खर्च करावा लागला. आातापर्यंतचे उत्पादन एकरी सरासरी दीड ते दोन क्विंटल आले असून, आता पुन्हा नवे संकट उभे ठाकल्याचे दिसत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.