शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जेष्ठ धन्वंतरी के.एस. पाटील यांचे निधन

By admin | Updated: May 22, 2017 01:11 IST

अकोला: केवळ अकोला जिल्हाच नव्हे विदर्भात प्रख्यात असलेले अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. काशिनाथ उपाख्य डॉ.के.एस. पाटील यांचे २१ मे राविवार रोजी निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: केवळ अकोला जिल्हाच नव्हे विदर्भात प्रख्यात असलेले अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. काशिनाथ उपाख्य डॉ.के.एस. पाटील यांचे २१ मे राविवार रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षांचे होते. सायंकाळी स्थानिक मोहता मिल स्मशानभूमीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र डॉ. अभय पाटील यांनी चिताग्नी दिला.डॉ. के.एस. पाटील यांनी ४५ वर्ष रुग्णांना सेवा दिली. केवळ अकोला जिल्ह्यातच नव्हे नाशिक, जळगाव खान्देशसह विदर्भातील हजारो रुग्णांवर त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.डॉ. काशिनाथ श्रीपतराव पाटील यांचे मूळ गाव जळगाव खान्देश जिल्ह्यातील बोदवड तालुक्यतील मनूर हे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण या लहानशा गावात झाले. त्यांनी भुसावळ येथील प्रताप महाविद्यालयातून बीएससीची पदवी घेतल्यानंतर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर औरंगाबाद येथील घाटी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी एमएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयात आर्थोपेडिक विभाग सुरू करू न काही वर्ष तेथेच कार्य केले. त्यानंतर १९६७ पासून अकोला येथे त्यांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. त्यांची ही सेवा २०१५ पर्यंत अखंडपणे सुरू होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी वैद्यकीय सेवा बंद केली.वैद्यकीय सेवेसोबतच डॉ. पाटील यांचे सामाजिक कार्यातही भरीव योगदान होते. सन १९६५ च्या भारत-पाक युद्धात जखमी झालेल्या अनेक सैनिकांवर त्यांनी शस्त्रक्रिया, उपचार केले. विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष म्हणूनही काही वर्ष त्यांनी काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी काम केले. या भागात मराठा समाजातील पहिले अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तसेच मुलगा डॉ. अभय पाटील, ३ मुली, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. रविवारी सायंकाळी निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत खासदार संजय धोत्रे, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, गुलाबराव गावंडे, प्रा. अजहर हुसेन,माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, प्रा. तुकाराम बिरकड, नातिकोद्दीन खतीब, डॉ. जगन्नाथ ढोणे, बबनराव चौधरी, दादाराव मते पाटील, श्रीकांत पिसे पाटील, प्रा. उदय देशमुख,विजय मालोकार, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, प्रकाश मानकर, डॉ. दीपक मोरे, डॉ. संजय सरोदे, डॉ.के.एन. भांबुरकर, डॉ. सुभाष मापारी, डॉ. रणजित कोरडे, डॉ. शिरीष थोरात, शंकरराव वाकोडे, प्रदीप खाडे,रणजित काळे,आश्वीन नवले, प्रकाश तायडे, मार्तंडराव माळी, पंकज जायले,रमेशभाई भोजने, डॉ. अमोल रावणकर, अशोक पटोकार, संजय लुंगे, सुनील जानोरकर, धनराज लाहोळे, कुलट गुरुजी, सुरेश खुमकर, डॉ. सुधीर ढोणे, विनायक पांडे, बाबाराव विखे पाटील, दिलीप बोचे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, किशोर मांगटे पाटील, डॉ. अशोक ओळंबे, अरविंद अग्रवाल, संजय अग्रवाल, डॉ. राजकुमार हेडा, रमेश कोठारी, अजय शर्मा, संजय शर्मा, गौतम गवई, जावेद अली, डॉ. अविनाश तेलगोटे, अविनाश पाटील, गोपाळराव गालट, श्याम कोल्हे, निवृत्ती वानखडे, ब्रह्मा पांडे, प्रवीण बाणेरकर, डॉ. संतोष भिसे, संतोष ढोरे, हिंमतराव मेंटागे, भागवत पाटील, शंकरराव हागे, यांच्यासह समाजिक, राजकीय, साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.