शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बियाणे भाववाढीची शेतकर्‍यांना धास्ती

By admin | Updated: May 18, 2014 20:18 IST

सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढत गेला व उत्पन्नात मात्र घट झाली; शिवाय सोयाबीनला हमीभाव नाही.

सायखेड (अकोला) : सततच्या नापिकीमुळे मानसिकरित्या खचलेल्या बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकर्‍यांना आता बियाणे भाववाढीची भीती सतावत आहे. कपाशीला मागे ठेवत शेतकर्‍यांनी बर्‍यापैकी सोयाबीनला प्राधान्य दिले; परंतु हळूहळू मात्र सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढत गेला व त्या प्रमाणात उत्पन्नात मात्र घट झाली. याशिवाय भावाची हमी नसल्याने तर शेतकर्‍यांना मिळेल त्या भावाने सोयाबीन विकावे लागले. यावर्षीची शेतकर्‍यांची दशा तर पाहावेनाशी आहे. खरिपात अतिवृष्टीचा, तर रब्बी हंगामात शेतकर्‍यांना गारपिटीचा तडाखा बसला. शेतकर्‍यांचे पार कंबरडे मोडले. खिशात दमडीही नाही, सोसायट्यांनी कर्ज अद्याप दिले नाही. पेरणीचे दिवस उंबरठ्यावर आले असताना सोयाबीनच्या बियाण्याचे भाव वाढणार असल्याची चर्चा आहे. व्यापार्‍यांकडे सोयाबीन बियाण्याचा माल येत आहे. नामांकित कंपन्याच्या ३0 किलोच्या सोयाबीनच्या बॅगवर २७00 रुपयांची एमआरपी प्रिंट करण्यात आली आहे. महाबीजचा भाव निघायचा आहे. महागड्या किमतीचे बियाणे खरेदी केल्यानंतर उत्पन्न होत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलाआहे. बियाणे घेताना शेतकर्‍यांनी विशिष्ट कंपनीचा आग्रह न धरता डबल लेबल असलेले बियाणे निवडल्यास काही विशिष्ट कंपन्याची मोनोपली राहणार नाही व त्यामुळे कृत्रिम भाववाढीस तोंड देण्याची वेळ शेतकर्‍यांवर येणार नाही. सोयाबीनपाठोपाठ या भागात घेतले जाणारे दुसरे पीक कपाशीचे आहे. यावर्षी कपाशीचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकले नाही. हरभरा पिकाचे गारपिटीने नुकसान तर झालेच; परंतु हरभर्‍याला सध्या घेवालही नाही. या पृष्ठभूमीवर कपाशीचा पर्याय शेतकरी स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. बियाणे खरेदी केल्यानंतर औषधांचा खर्च हा सुद्धा आवाक्याबाहेरचा आहे. फवारणी केली नाही तर अळ्या पीक फस्त करतात. यामुळे काय करावे, हे शेतकर्‍यांना सुचत नाही.