शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयेही राहणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:00 IST

शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरुवातीला शहरातील शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. यातून ग्रामीण भाग वगळण्यात आला होता; परंतु शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १६ मार्च रोजी ग्रामीण भागातील सर्व सरकारी, खासगी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, खबरदारी म्हणून आणि कोरोनाचा आजार रोखण्याच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागाने शनिवारी राज्यातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला होता; परंतु यातून ग्रामीण भाग वगळण्यात आला होता. त्यामुळे शिक्षक, शिक्षक संघटना, शिक्षण संस्थाचालकांनी नाराजी व्यक्त केली होती आणि कोरोनाचा धोका ग्रामीण भागाला नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. शहरांमधील शाळांमध्येच विद्यार्थ्यांची गर्दी होत नाही तर ग्रामीण भागातील शाळांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असल्याने, ग्रामीण भागातसुद्धा शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले. १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीसुद्धा आदेश काढत, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यास बजावले आहे. या निर्देशाची अवहेलना केल्यास, भादंवि कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील दिला आहे.

शिक्षकांना ड्युटी, शिक्षक संघटनांची नाराजीकोरोनाबाबत खबरदारी घेण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे; परंतु शिक्षकांना सुट्टी न दिल्यामुळे, त्यांना शाळेत जाऊन ड्युटी करावी लागत आहे. याबाबत शिक्षकांसह शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी, शिक्षकांनी शाळेत जाऊन त्यांची इतर शैक्षणिक कामे करण्यास म्हटले आहे; परंतु या निर्णयाबाबत शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त करीत, शिक्षक माणसे नाहीत का, त्यांना कोरोना विषाणूपासून बाधा होणार नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविण्याचे प्रमुख काम आहे; परंतु विद्यार्थीच शाळेत नाहीत तर शिक्षकांनी शाळेत जाऊन काय करायचे? त्यामुळे शिक्षकांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्ठी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस