शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयेही राहणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:00 IST

शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरुवातीला शहरातील शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. यातून ग्रामीण भाग वगळण्यात आला होता; परंतु शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १६ मार्च रोजी ग्रामीण भागातील सर्व सरकारी, खासगी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, खबरदारी म्हणून आणि कोरोनाचा आजार रोखण्याच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागाने शनिवारी राज्यातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला होता; परंतु यातून ग्रामीण भाग वगळण्यात आला होता. त्यामुळे शिक्षक, शिक्षक संघटना, शिक्षण संस्थाचालकांनी नाराजी व्यक्त केली होती आणि कोरोनाचा धोका ग्रामीण भागाला नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. शहरांमधील शाळांमध्येच विद्यार्थ्यांची गर्दी होत नाही तर ग्रामीण भागातील शाळांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असल्याने, ग्रामीण भागातसुद्धा शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले. १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीसुद्धा आदेश काढत, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यास बजावले आहे. या निर्देशाची अवहेलना केल्यास, भादंवि कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील दिला आहे.

शिक्षकांना ड्युटी, शिक्षक संघटनांची नाराजीकोरोनाबाबत खबरदारी घेण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे; परंतु शिक्षकांना सुट्टी न दिल्यामुळे, त्यांना शाळेत जाऊन ड्युटी करावी लागत आहे. याबाबत शिक्षकांसह शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी, शिक्षकांनी शाळेत जाऊन त्यांची इतर शैक्षणिक कामे करण्यास म्हटले आहे; परंतु या निर्णयाबाबत शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त करीत, शिक्षक माणसे नाहीत का, त्यांना कोरोना विषाणूपासून बाधा होणार नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविण्याचे प्रमुख काम आहे; परंतु विद्यार्थीच शाळेत नाहीत तर शिक्षकांनी शाळेत जाऊन काय करायचे? त्यामुळे शिक्षकांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्ठी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस