शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थी घेणार शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 13:52 IST

नितीन गव्हाळे ।अकोला: दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदापासून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीचे महत्त्व ...

ठळक मुद्देशिक्षण संचालकांचे शिक्षणाधिकाºयांना पत्र शाळांमध्ये उपक्रम घेण्याचा आदेश

नितीन गव्हाळे ।अकोला: दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदापासून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीचे महत्त्व पटावे, या उद्देशाने मंगळवारी १0 आॅक्टोबर रोजी सकाळी १0.१५ वाजता राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येणार आहे.देशभरामध्ये दिवाळीचा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळीमध्ये आवाजी फटाके खरेदी करण्यासाठी मुले आणि युवकांचा अधिक आग्रह असतो. आवाजी व धूरयुक्त फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. या प्रदूषणामुळे दम्याचे, फुप्फुसाचे, श्वसनाचे आजार होतात. हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण रोखण्यासाठी शालेय स्तरावर जनजागृती करून विद्यार्थ्यांचे आवाजी फटाक्यांची आतषबाजी टाळण्यासाठी मन परिवर्तन व्हावे या उद्देशाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्याचा निर्णय पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शिक्षण विभागाला पत्र पाठवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येऊन, त्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे.राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आणि एकत्रितपणे शपथ घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या आदेशानंतर प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी शिक्षणाधिकाºयांनासुद्धा पत्र पाठवून सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत.