शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार शिजविणारे अडचणीत

By admin | Updated: May 21, 2015 01:43 IST

राज्यात पाच लाख कर्मचारी; थकीत मानधनासाठी आंदोलनाचा इशारा

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा :आधीच महागाई, त्यात अत्यल्प मानधन आणि तेही वेळेवर मिळत नसल्याने शालेय पोषण आहार शिजविणार्‍यांवर उपासमारीची पाळी आली आहे. राज्यात अशीच परिस्थिती कमी-जास्त प्रमाणात सर्वत्र आहे. त्यामुळे शासनाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. शासनाने यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्येही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजविण्याचे काम मदतनीस आणि स्वयंपाकी करीत आहेत. त्यांना केवळ एक ते दोन हजार रुपये मानधन दिले जाते. तेही वेळेवर मिळत नसल्याने मानधनावरील या कर्मचार्‍यांची उपासमार होत आहे. सध्या चार महिन्यांचे मानधन शासनाकडे थकले आहे. हे थकलेले मानधन त्वरित मिळावे, अशी मागणी या कर्मचार्‍यांनी केली आहे. *असे मिळते कर्मचा-यांना मानधन शासननिर्णय २0११ नुसार २५ विद्यार्थ्यांमागे खिचडी शिजविणार्‍या कर्मचार्‍याला एक हजार रुपये दरमहा मानधन म्हणजे दिवसाला फक्त ३३ रुपये रोज पडतो. यात केंद्र सरकारचा ७५0 रुपये आणि राज्य सरकारचा २५0 रुपये वाटा आहे. २५ ते २00 विद्यार्थ्यांपर्यंत दोन हजार रुपये मानधन दिले जाते. राज्यात सन २0१४-१५ मध्ये २ लाख ७३ हजार कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान, शासनाने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांची संख्या जवळपास पाच लाख झाली असून, तुटपुंज्या मानधनावर काम करणारे कर्मचारीन्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. *बुलडाणा जिल्ह्यात ४00 कर्मचारी बुलडाणा जिलत पोषण आहार शिजविणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या ४00 आहे. त्यांना मागील मार्च, एप्रिल आणि चालू मे महिन्याचे मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी शालेय पोषण आहार शिजविणार्‍यांची जनहित कल्याणकारी संघटनेने केली आहे. दरम्यान, मानधन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पवनकार, संस्थापक अध्यक्ष अरुण पाटील, सचिव संतोष भागवत यांनी दिला.