शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

विशाखा समिती स्थापन करण्यास शाळा उदासीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:09 IST

अकोला : शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक शाळा,  महाविद्यालयांमध्ये महिला अत्याचारविरोधी विशाखा समिती  स्थापन करणे बंधनकारक केले होते.

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी घेणार आढावाविशाखा समिती बंधनकारकच!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक शाळा,  महाविद्यालयांमध्ये महिला अत्याचारविरोधी विशाखा समिती  स्थापन करणे बंधनकारक केले होते.  शिक्षणाधिकार्‍यांनीसुद्धा शाळा व महाविद्यालय स्तरावर  विशाखा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते; परंतु  जिल्हय़ातील ८५ टक्के शाळा, महाविद्यालयांनी विशाखा  समिती स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले. जिल्हय़ातील किती  शाळा, महाविद्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन झाल्या  आहेत. याचा आढावा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद घेणार  असून, ज्या शाळा, महाविद्यालयांमध्ये विशाखा समिती नस तील, त्या शाळांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात  येणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा,  महाविद्यालयांमध्ये कार्यरत महिला कर्मचारी, विद्यार्थिनी  यांच्यावर लैंगिक अत्याचार घडल्याच्या अनेक घटना  आजूबाजूला घडताना दिसतात. याला प्रतिबंध  घालण्यासाठी शासनाने महिला अत्याचारविरोधी विशाखा  समिती स्थापन करून त्यात महिलांसह अधिकारी वर्गाला  सामावून घेण्याचा आदेश काढला होता. त्यानुसार शाळा,  महाविद्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यासंदर्भात  शिक्षणाधिकार्‍यांनी आदेश दिले होते; परंतु अनेक शाळा,  महाविद्यालयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही शाळा,  महाविद्यालयांनी केवळ कागदावर समिती स्थापन केली; परं तु त्या समितीच्या बैठकी, त्याचे अहवाल शिक्षणाधिकारी  कार्यालयाकडे प्राप्त झाले नाहीत. अकोट येथील एका  शाळेमधे शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना  नुकतीच घडली. या घटनेच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद हे  शाळा, महाविद्यालयांमधील विशाखा समितीचा आढावा  घेणार आहेत. ज्या शाळा, महाविद्यालयांमध्ये विशाखा समि तीची स्थापना केली नसल्यास, त्यांना शिक्षणाधिकारी  कार्यालयाकडून नोटीस बजावून मुख्याध्यापक,  प्राचार्यांकडून खुलासा मागविण्यात येणार आहे आणि  शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची बैठक घेऊन त्यात  त्यांना महिला अत्याचारविरोधी विशाखा समिती स्थापन  करणे बंधनकारक राहणार असून, त्याचा अहवाल दर  महिन्याला मागविण्यात येईल, असेही शिक्षणाधिकारी प्रकाश  मुकुंद यांनी स्पष्ट केले. 

विशाखा समितीचा फलक लावणे बंधनकारकज्या शाळा, महाविद्यालयांनी विशाखा समिती सुरू केली  नाही, त्यांनी समितीची स्थापना करून, त्यात जबाबदारी व  योग्य शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधींना  स्थान द्यावे आणि शाळा, महाविद्यालयात विशाखा समि तीच्या पदाधिकार्‍यांच्या नावांसह फलक लावावा. त्या  फलकावर पदाधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक असावेत.

अन्यथा अनुदान होईल बंदशिक्षणाधिकार्‍यांच्या आदेशानंतरही कोणतीही शाळा,  महाविद्यालय विशाखा समिती स्थापन करण्यास चालढकल  करीत असेल आणि तसा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या  शाळेचे, महाविद्यालयाचे अनुदान रोखण्यासाठी शासनाकडे  प्रस्ताव पाठविण्यात येईल. विशाखा समिती स्थापन  करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत,  असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सांगितले.