शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

शालेय विद्यार्थी देताहेत वृक्षसंवर्धनाचा संदेश!

By admin | Updated: May 6, 2016 02:17 IST

छोट्यांच्या मोठय़ा गोष्टी; उन्हाळय़ाच्या सुटीत सुरू केला आगळावेगळा उपक्रम.

अतुल जयस्वाल / अकोलापरीक्षा संपून उन्हाळय़ाच्या सुट्या सुरू झाल्या की, डोक्यावरचा ताण हलका झालेली बच्चेकंपनी अख्खे घर डोक्यावर घेऊन धिंगाणा घालते. त्यापैकी कुणी उन्हाळी शिबिरांमध्ये सहभागी होतात, तर कुणी मामाच्या गावाची वाट धरतात. अकोला शहरातील काही चिमुकल्यांनी मात्र उन्हाळय़ाच्या सुटीत लोकांमध्ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. जंगलांची बेसुमार कत्तल होत असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. पृथ्वीवरील हिरवा शालू जागोजागी फाटल्यामुळे जागतिक तापमानवाढ, निसर्गाचे बिघडलेले चक्र, दुष्काळ असे भयंकर परिणाम समोर येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत उन्हाळा अधिक प्रखर होऊ लागला आहे. महाराष्ट्रात तर यावर्षी अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षांची लागवड करून पृथ्वीला पुन्हा हिरव्या शालूने मढविणे हा एकमेव पर्याय आहे. ही बाब लक्षात घेऊन अकोला शहरातील संदेशनगर भागातील सागर कॉलनीतील सहा चिमुकल्यांनी लोकांना वृक्षारोपणासाठी प्रवृत्त करण्याचा निर्णय घेतला. 'चिल्ड्रेन ग्रुप'ची स्थापना त्यांनी केली. यासाठी १ मे, महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त ठरला. कुणाचीही मदत न घेता या चिमुकल्यांनी घरोघरी, कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने अशा विविध ठिकाणी लोकांच्या भेटी घेऊन त्यांना वृक्षारोपणासाठी प्रेरित करण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत या चिमुकल्यांनी दीडशेपेक्षाही अधिक लोकांच्या भेटी घेऊन त्यांना वृक्षारोपणाचा संदेश दिला आहे.