शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

शालेय पुस्तकं आता ई-बुक्सच्या रूपात!

By admin | Updated: December 5, 2014 23:44 IST

केंद्र शासनाची योजना.

अकोला : आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत केंद्र शासन शालेय पुस्तकांना आता ई-बुक्समध्ये रुपांतरित करणार आहे. शासनाने या प्रकल्पाला ह्यई-बस्ताह्ण असे नाव दिले आहे. ई-बुक्स तयार करण्याची जबाबदारी सीडॅककडे देण्यात आली असून, महिनाभरात ही ई-बुक्स ऑनलाईन उपलब्ध होतील. मोदी सरकारने ई-तंत्रज्ञानाला महत्त्व दिले आहे. सोशल मिडीयाचा अधिकाधिक वापर करण्यावर या शासनाचा भर आहे. विद्यार्थ्यांनादेखील ई-तंत्रज्ञानाशी जुळता यावे, यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके ई-बुक्सच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने योजना तयार केली आहे. हा उपक्रम डिजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत हाती घेण्यात आला आहे. यात बायोमेट्रीक हजेरी आणि ई-ग्रिटींगसारख्या कार्यक्रमाचादेखील समावेश आहे. केंद्र शासनाने ऑगस्ट महिन्यातच डिजीटल इंडिया प्रकल्पाच्या ब्ल्यूप्रिंटला मंजुरी दिली आहे. त्यासाठी पुढील तीन वर्षात एक लाख कोटींची गुंतवणुक करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाला ई-बुक्ससाठी शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची यादी आणि प्राधान्यक्रम ठरविण्याची सूचना करण्यात आली आहे. एनसीईआरटीसोबत समन्वय साधून ही यादी तयार करण्यात येणार आहे. सध्या काही खासगी संस्था एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित ई-बुक्स तयार करण्याचे काम करीत आहेत; परंतु हे काम वेगवेगळ्या आघाड्यांवर विस्कळीत झाले आहे. म्हणूनच केंद्र शासनाने ई-बुक्ससाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँडव्हान्स कॉम्प्युटरींग (सीडॅक) या संस्थेला एकच प्लॅटफार्म तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.