शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

टंचाईसदृश गावांमध्ये सवलतींची अंमलबजावणी अधांतरी

By admin | Updated: May 28, 2014 22:13 IST

गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

अकोला : गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. आठवडा उलटून गेला तरी, टंचाईसदृश गावांना द्यावयाच्या सवलतीबाबत संबंधित यंत्रणांकडून अद्याप कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे टंचाईसदृश गावांना सवलती देण्याच्या निर्णयाची स्थिती अधांतरी आहे.शासनाच्या गत ३० एप्रिल रोजीच्या निर्णयानुसार खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असलेल्या ९९७ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गेल्या १९ मे रोजी काढला. टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये शासन निर्णयानुसार विविध सवलती द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे रुपांतरण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सूट, परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक तेथे टँकर्सचा वापर आणि शेतकर्‍यांच्या कृषिपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, अशा विविध प्रकारच्या सवलतींचा समावेश आहे. त्यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून, अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), जिल्हा कृषी विकास अधिकारी, प्राथामिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व इतर सर्वच संबंधित विभाग आणि यंत्रणांच्या अधिकार्‍यांना आदेशात दिले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर आठवडा उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील टंचाईसदृश गावांमध्ये द्यावयाच्या सवलतीसंदर्भात संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आली नाही, किंवा तसा अहवाल अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईसदृश गावांमध्ये द्यावयाच्या विविध सवलतींबाबतचा निर्णय अंमलबजावणीविना अधांतरी असल्याचे चित्र आहे.