शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईसदृश गावांमध्ये सवलतींची अंमलबजावणी अधांतरी

By admin | Updated: May 28, 2014 22:13 IST

गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

अकोला : गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. आठवडा उलटून गेला तरी, टंचाईसदृश गावांना द्यावयाच्या सवलतीबाबत संबंधित यंत्रणांकडून अद्याप कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे टंचाईसदृश गावांना सवलती देण्याच्या निर्णयाची स्थिती अधांतरी आहे.शासनाच्या गत ३० एप्रिल रोजीच्या निर्णयानुसार खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असलेल्या ९९७ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गेल्या १९ मे रोजी काढला. टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये शासन निर्णयानुसार विविध सवलती द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे रुपांतरण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सूट, परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक तेथे टँकर्सचा वापर आणि शेतकर्‍यांच्या कृषिपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, अशा विविध प्रकारच्या सवलतींचा समावेश आहे. त्यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून, अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), जिल्हा कृषी विकास अधिकारी, प्राथामिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व इतर सर्वच संबंधित विभाग आणि यंत्रणांच्या अधिकार्‍यांना आदेशात दिले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर आठवडा उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील टंचाईसदृश गावांमध्ये द्यावयाच्या सवलतीसंदर्भात संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आली नाही, किंवा तसा अहवाल अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईसदृश गावांमध्ये द्यावयाच्या विविध सवलतींबाबतचा निर्णय अंमलबजावणीविना अधांतरी असल्याचे चित्र आहे.