शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकार; ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 14:47 IST

Agriculture News : मूर्तिजापूर तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकारअसून, ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे

-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात ९७ टक्के पेरणी झाली आहे, यावर्षी पीक परिस्थिती समाधानकार असून आंतरमशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. काही भागात नदी काठावरील गावातील शेतीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, याचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे.              तालुक्यात ७२ हजार ६९८ पेरणी लक्षांक होता जवळपास हा लक्षांक पुर्ण झाला असून ७ हजार ५२६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातील अतिवृष्टीमुळे व नदी काठावर असलेल्या शेतजमीनत पुराचे पाणी शिरल्याने शेती खरडून गेल्याने ७० गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ३३ टक्क्याच्या वर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत मिळणार असल्याची माहिती आहे. यासाठी ४३ लाख १ हजार २०० रुपये एवढा निधी अपेक्षित आहे याचा अंतिम अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असल्याने शेतकऱ्यांना येत्या काळात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पेरा ११ हजार ६३५ हेक्टर होता त्या पेक्षा यावर्षी कपाशी पेऱ्यात निम्म्याने घट झाल्याने तो केवळ ६ हजार ८७२ हेक्टरवर आला आहे. तर सोयाबीनची गतवर्षी ४३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी झाली होती यावर्षी ती ४७ हजार १७७ हेक्टर झाली असल्याने त्या ३ हजार हेक्टर पेक्षा जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. जुन - जुलै महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली असून या महिन्यात ४६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, सरासरीपेक्षा १२४ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकार असून १५ जून दरम्यान पेरणी झालेले सोयाबीन पोपट व फुलोरावस्थेत आहे,तर कपाशीला पाते पकडले आहे.असा आहे पीक पेरातुर ११ हजर १५६ हेक्टर, उडीद १ हजार २४१ हेक्टर, मुग ३ हजार ७२० हेक्टर, ऊस, ११.४ हेक्टर, तीळ १३ हेक्टर, सोयाबीन ४७ हजार १७७ हेक्टर कापूस ६ हजार ८७२ हेक्टर

फळ पीके सोडून झालेले नुकसान

फळ पीके सोडून जिरायती पीकाचे ६८ गावात नुकसान झाले. सोयाबीन ४६०.६७ हेक्टर, तुर ६४.९९ हेक्टर, कापूस ७३.३४ हेक्टर, मुग १२.५५ हेक्टर, उडीद १८ हेक्टर, तीळ.२० हेक्टर अशा ६२९.७५ हेक्टर जमिनीवरील पीकाचे नुकसान झाले आहे.

सद्यस्थितीत सोयाबीनवर उंट अळी तंबाखूचे पाने खाणारी अळी, चक्रीभुंगा या सारख्या किटकनाशकांचा प्रश्नदुर्भाव आहे.  निरिक्षणे घेऊन किटकनाशकांचा वापर करावा, पोपट अवस्थेत २ टक्के सल्फरची फवारणी करावी, पाते असलेल्या कपाशीवर निंबोळी अर्क फवारणी करणे आवश्यक आहे, भविष्यात बोंडअळी टाळण्यासाठी अनावश्यक टॉनिक फवारणी टाळावी. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त जमीनीचे सर्वेक्षण झाले आहे व त्याचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे-अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूरजुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील फळबाग वगळता ६८ गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनान हेक्टरी मदत जाहीर करेल ती एकाच दिवसात शेतकरी बांधवांना वितरीत करण्यात येईल. -प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेती