शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

मूर्तिजापूर तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकार; ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 14:47 IST

Agriculture News : मूर्तिजापूर तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकारअसून, ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे

-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात ९७ टक्के पेरणी झाली आहे, यावर्षी पीक परिस्थिती समाधानकार असून आंतरमशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. काही भागात नदी काठावरील गावातील शेतीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, याचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे.              तालुक्यात ७२ हजार ६९८ पेरणी लक्षांक होता जवळपास हा लक्षांक पुर्ण झाला असून ७ हजार ५२६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातील अतिवृष्टीमुळे व नदी काठावर असलेल्या शेतजमीनत पुराचे पाणी शिरल्याने शेती खरडून गेल्याने ७० गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ३३ टक्क्याच्या वर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत मिळणार असल्याची माहिती आहे. यासाठी ४३ लाख १ हजार २०० रुपये एवढा निधी अपेक्षित आहे याचा अंतिम अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असल्याने शेतकऱ्यांना येत्या काळात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पेरा ११ हजार ६३५ हेक्टर होता त्या पेक्षा यावर्षी कपाशी पेऱ्यात निम्म्याने घट झाल्याने तो केवळ ६ हजार ८७२ हेक्टरवर आला आहे. तर सोयाबीनची गतवर्षी ४३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी झाली होती यावर्षी ती ४७ हजार १७७ हेक्टर झाली असल्याने त्या ३ हजार हेक्टर पेक्षा जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. जुन - जुलै महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली असून या महिन्यात ४६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, सरासरीपेक्षा १२४ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकार असून १५ जून दरम्यान पेरणी झालेले सोयाबीन पोपट व फुलोरावस्थेत आहे,तर कपाशीला पाते पकडले आहे.असा आहे पीक पेरातुर ११ हजर १५६ हेक्टर, उडीद १ हजार २४१ हेक्टर, मुग ३ हजार ७२० हेक्टर, ऊस, ११.४ हेक्टर, तीळ १३ हेक्टर, सोयाबीन ४७ हजार १७७ हेक्टर कापूस ६ हजार ८७२ हेक्टर

फळ पीके सोडून झालेले नुकसान

फळ पीके सोडून जिरायती पीकाचे ६८ गावात नुकसान झाले. सोयाबीन ४६०.६७ हेक्टर, तुर ६४.९९ हेक्टर, कापूस ७३.३४ हेक्टर, मुग १२.५५ हेक्टर, उडीद १८ हेक्टर, तीळ.२० हेक्टर अशा ६२९.७५ हेक्टर जमिनीवरील पीकाचे नुकसान झाले आहे.

सद्यस्थितीत सोयाबीनवर उंट अळी तंबाखूचे पाने खाणारी अळी, चक्रीभुंगा या सारख्या किटकनाशकांचा प्रश्नदुर्भाव आहे.  निरिक्षणे घेऊन किटकनाशकांचा वापर करावा, पोपट अवस्थेत २ टक्के सल्फरची फवारणी करावी, पाते असलेल्या कपाशीवर निंबोळी अर्क फवारणी करणे आवश्यक आहे, भविष्यात बोंडअळी टाळण्यासाठी अनावश्यक टॉनिक फवारणी टाळावी. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त जमीनीचे सर्वेक्षण झाले आहे व त्याचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे-अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूरजुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील फळबाग वगळता ६८ गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनान हेक्टरी मदत जाहीर करेल ती एकाच दिवसात शेतकरी बांधवांना वितरीत करण्यात येईल. -प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेती