शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

थेट सरपंचांना मिळणार दोन वर्ष ‘अविश्‍वासा’पासून मुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:06 IST

थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आता राज्यभरात  थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोल्या तील २७२ ग्रामपंचायतींमधून निवडले जाणारे थेट सरपंच हे  अधिकारांच्या दृष्टीने सक्षम करण्याबाबत राज्य सरकार पावले  उचलत आहे. त्यामधीलच एक भाग म्हणजे या थेट सर पंचांना काम करण्यास मोकळीक मिळावी म्हणून दोन वर्ष  अविश्‍वास प्रस्तावाला समोरे जावे लगणार नाही.

ठळक मुद्देविशेषाधिकारही मिळणार अर्थसंकल्प तयार करण्याचीही जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:  थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आता राज्यभरात  थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोल्या तील २७२ ग्रामपंचायतींमधून निवडले जाणारे थेट सरपंच हे  अधिकारांच्या दृष्टीने सक्षम करण्याबाबत राज्य सरकार पावले  उचलत आहे. त्यामधीलच एक भाग म्हणजे या थेट सर पंचांना काम करण्यास मोकळीक मिळावी म्हणून दोन वर्ष  अविश्‍वास प्रस्तावाला समोरे जावे लगणार नाही.विद्यमान अधिनियमाच्या तरतुदीनुसार पंचायतीमध्ये निवडून  आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केल्या जाते.  सदस्यांच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश सदस्य सं ख्येपेक्षा कमी नसतील एवढय़ा सदस्यांना अविश्‍वास प्रस्ताव  मांडता येतो. वारंवार मांडल्या जाणार्‍या अविश्‍वास प्रस्तावामुळे सरपंचाच्या  कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे निवडून आलेल्या सर पंचांना आपले काम अतिशय प्रभावीपणे करता यावे  यासाठीच दोन वर्ष अविश्‍वास प्रस्ताव आणता येणार नाही,  असे बंधन घालून प्रचलीत पद्धतीमध्ये बदल करण्यात  आल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.थेट सरपंचाला काही विशेषाधिकार देण्यात आले आहे.  यामध्ये ग्रामपंचायतीच्या सभांच्या कार्यसूचीला अंतिम रूप  देणे, तीन किंवा जास्त सदस्यांची मागणी असल्यास ती बाब  पुढच्या सभेच्या कार्यसूचीत समाविष्ट करणे, पंचायतींच्या  सर्व ग्रामसभांचा व ग्रामविकास समित्यांच्या अध्यक्षस्थानी  सरपंचच राहणार आहे. 

अर्थसंकल्प तयार करावा लागेल! ग्रामपंचायतीच्या वार्षिक आराखडा तयार करण्याचे काम सर पंचांना करावे लगाणार आहे. सरपंच ५ जानेवारीपूर्वी निधी तील प्रारंभिक शिल्लक व पुढील वित्तीय वर्षासाठी पंचायतींची  अंदाजित प्राप्ती विवरण सादर करेल. पंचायत ३१ जानेवारीपूर्वी विवरणाच्या शिफारसीला अंतिम  स्वरूप देईल. २८ फेब्रुवारीपूर्वी ग्रामसभेच्या अनुसर्मथनार्थ  ठेवण्यात येणार आहे. पंचायत समितीद्वारा ३१ मार्चपूर्वी विवरणास मान्यता देणार  आहे. गावाच्या विकासासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची  जबाबदारी सरपंच्याकडेच राहणार आहे. 

अविश्‍वास प्रस्तावाला ग्रामसभेची हवी मंजुरी!थेट सरपंच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव जर ग्रामपंचायतीच्या  तीन चतुर्थांस सदस्यांनी संमत केला असला तरी  जिल्हाधिकार्‍यांनी या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या  अधिकार्‍यांच्या समक्ष व त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष  ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाद्वारे याला मंजुरी दिली पाहिजे.  तरच सरपंच त्यांचे कार्य थांबवतील व अधिकार, कार्ये व  कर्तव्ये उपसरपंच्याकडे सुपूर्द करतील, असा मोठा बदल  ग्रामविकास विभागाने केला आहे.