शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

थेट सरपंचांना मिळणार दोन वर्ष ‘अविश्‍वासा’पासून मुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:06 IST

थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आता राज्यभरात  थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोल्या तील २७२ ग्रामपंचायतींमधून निवडले जाणारे थेट सरपंच हे  अधिकारांच्या दृष्टीने सक्षम करण्याबाबत राज्य सरकार पावले  उचलत आहे. त्यामधीलच एक भाग म्हणजे या थेट सर पंचांना काम करण्यास मोकळीक मिळावी म्हणून दोन वर्ष  अविश्‍वास प्रस्तावाला समोरे जावे लगणार नाही.

ठळक मुद्देविशेषाधिकारही मिळणार अर्थसंकल्प तयार करण्याचीही जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:  थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आता राज्यभरात  थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोल्या तील २७२ ग्रामपंचायतींमधून निवडले जाणारे थेट सरपंच हे  अधिकारांच्या दृष्टीने सक्षम करण्याबाबत राज्य सरकार पावले  उचलत आहे. त्यामधीलच एक भाग म्हणजे या थेट सर पंचांना काम करण्यास मोकळीक मिळावी म्हणून दोन वर्ष  अविश्‍वास प्रस्तावाला समोरे जावे लगणार नाही.विद्यमान अधिनियमाच्या तरतुदीनुसार पंचायतीमध्ये निवडून  आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केल्या जाते.  सदस्यांच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश सदस्य सं ख्येपेक्षा कमी नसतील एवढय़ा सदस्यांना अविश्‍वास प्रस्ताव  मांडता येतो. वारंवार मांडल्या जाणार्‍या अविश्‍वास प्रस्तावामुळे सरपंचाच्या  कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे निवडून आलेल्या सर पंचांना आपले काम अतिशय प्रभावीपणे करता यावे  यासाठीच दोन वर्ष अविश्‍वास प्रस्ताव आणता येणार नाही,  असे बंधन घालून प्रचलीत पद्धतीमध्ये बदल करण्यात  आल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.थेट सरपंचाला काही विशेषाधिकार देण्यात आले आहे.  यामध्ये ग्रामपंचायतीच्या सभांच्या कार्यसूचीला अंतिम रूप  देणे, तीन किंवा जास्त सदस्यांची मागणी असल्यास ती बाब  पुढच्या सभेच्या कार्यसूचीत समाविष्ट करणे, पंचायतींच्या  सर्व ग्रामसभांचा व ग्रामविकास समित्यांच्या अध्यक्षस्थानी  सरपंचच राहणार आहे. 

अर्थसंकल्प तयार करावा लागेल! ग्रामपंचायतीच्या वार्षिक आराखडा तयार करण्याचे काम सर पंचांना करावे लगाणार आहे. सरपंच ५ जानेवारीपूर्वी निधी तील प्रारंभिक शिल्लक व पुढील वित्तीय वर्षासाठी पंचायतींची  अंदाजित प्राप्ती विवरण सादर करेल. पंचायत ३१ जानेवारीपूर्वी विवरणाच्या शिफारसीला अंतिम  स्वरूप देईल. २८ फेब्रुवारीपूर्वी ग्रामसभेच्या अनुसर्मथनार्थ  ठेवण्यात येणार आहे. पंचायत समितीद्वारा ३१ मार्चपूर्वी विवरणास मान्यता देणार  आहे. गावाच्या विकासासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची  जबाबदारी सरपंच्याकडेच राहणार आहे. 

अविश्‍वास प्रस्तावाला ग्रामसभेची हवी मंजुरी!थेट सरपंच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव जर ग्रामपंचायतीच्या  तीन चतुर्थांस सदस्यांनी संमत केला असला तरी  जिल्हाधिकार्‍यांनी या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या  अधिकार्‍यांच्या समक्ष व त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष  ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाद्वारे याला मंजुरी दिली पाहिजे.  तरच सरपंच त्यांचे कार्य थांबवतील व अधिकार, कार्ये व  कर्तव्ये उपसरपंच्याकडे सुपूर्द करतील, असा मोठा बदल  ग्रामविकास विभागाने केला आहे.