शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

थेट सरपंचांना मिळणार दोन वर्ष ‘अविश्‍वासा’पासून मुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:06 IST

थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आता राज्यभरात  थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोल्या तील २७२ ग्रामपंचायतींमधून निवडले जाणारे थेट सरपंच हे  अधिकारांच्या दृष्टीने सक्षम करण्याबाबत राज्य सरकार पावले  उचलत आहे. त्यामधीलच एक भाग म्हणजे या थेट सर पंचांना काम करण्यास मोकळीक मिळावी म्हणून दोन वर्ष  अविश्‍वास प्रस्तावाला समोरे जावे लगणार नाही.

ठळक मुद्देविशेषाधिकारही मिळणार अर्थसंकल्प तयार करण्याचीही जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:  थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आता राज्यभरात  थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोल्या तील २७२ ग्रामपंचायतींमधून निवडले जाणारे थेट सरपंच हे  अधिकारांच्या दृष्टीने सक्षम करण्याबाबत राज्य सरकार पावले  उचलत आहे. त्यामधीलच एक भाग म्हणजे या थेट सर पंचांना काम करण्यास मोकळीक मिळावी म्हणून दोन वर्ष  अविश्‍वास प्रस्तावाला समोरे जावे लगणार नाही.विद्यमान अधिनियमाच्या तरतुदीनुसार पंचायतीमध्ये निवडून  आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केल्या जाते.  सदस्यांच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश सदस्य सं ख्येपेक्षा कमी नसतील एवढय़ा सदस्यांना अविश्‍वास प्रस्ताव  मांडता येतो. वारंवार मांडल्या जाणार्‍या अविश्‍वास प्रस्तावामुळे सरपंचाच्या  कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे निवडून आलेल्या सर पंचांना आपले काम अतिशय प्रभावीपणे करता यावे  यासाठीच दोन वर्ष अविश्‍वास प्रस्ताव आणता येणार नाही,  असे बंधन घालून प्रचलीत पद्धतीमध्ये बदल करण्यात  आल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.थेट सरपंचाला काही विशेषाधिकार देण्यात आले आहे.  यामध्ये ग्रामपंचायतीच्या सभांच्या कार्यसूचीला अंतिम रूप  देणे, तीन किंवा जास्त सदस्यांची मागणी असल्यास ती बाब  पुढच्या सभेच्या कार्यसूचीत समाविष्ट करणे, पंचायतींच्या  सर्व ग्रामसभांचा व ग्रामविकास समित्यांच्या अध्यक्षस्थानी  सरपंचच राहणार आहे. 

अर्थसंकल्प तयार करावा लागेल! ग्रामपंचायतीच्या वार्षिक आराखडा तयार करण्याचे काम सर पंचांना करावे लगाणार आहे. सरपंच ५ जानेवारीपूर्वी निधी तील प्रारंभिक शिल्लक व पुढील वित्तीय वर्षासाठी पंचायतींची  अंदाजित प्राप्ती विवरण सादर करेल. पंचायत ३१ जानेवारीपूर्वी विवरणाच्या शिफारसीला अंतिम  स्वरूप देईल. २८ फेब्रुवारीपूर्वी ग्रामसभेच्या अनुसर्मथनार्थ  ठेवण्यात येणार आहे. पंचायत समितीद्वारा ३१ मार्चपूर्वी विवरणास मान्यता देणार  आहे. गावाच्या विकासासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची  जबाबदारी सरपंच्याकडेच राहणार आहे. 

अविश्‍वास प्रस्तावाला ग्रामसभेची हवी मंजुरी!थेट सरपंच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव जर ग्रामपंचायतीच्या  तीन चतुर्थांस सदस्यांनी संमत केला असला तरी  जिल्हाधिकार्‍यांनी या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या  अधिकार्‍यांच्या समक्ष व त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष  ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाद्वारे याला मंजुरी दिली पाहिजे.  तरच सरपंच त्यांचे कार्य थांबवतील व अधिकार, कार्ये व  कर्तव्ये उपसरपंच्याकडे सुपूर्द करतील, असा मोठा बदल  ग्रामविकास विभागाने केला आहे.