शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

थेट सरपंचांना मिळणार दोन वर्ष ‘अविश्‍वासा’पासून मुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:06 IST

थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आता राज्यभरात  थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोल्या तील २७२ ग्रामपंचायतींमधून निवडले जाणारे थेट सरपंच हे  अधिकारांच्या दृष्टीने सक्षम करण्याबाबत राज्य सरकार पावले  उचलत आहे. त्यामधीलच एक भाग म्हणजे या थेट सर पंचांना काम करण्यास मोकळीक मिळावी म्हणून दोन वर्ष  अविश्‍वास प्रस्तावाला समोरे जावे लगणार नाही.

ठळक मुद्देविशेषाधिकारही मिळणार अर्थसंकल्प तयार करण्याचीही जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:  थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आता राज्यभरात  थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोल्या तील २७२ ग्रामपंचायतींमधून निवडले जाणारे थेट सरपंच हे  अधिकारांच्या दृष्टीने सक्षम करण्याबाबत राज्य सरकार पावले  उचलत आहे. त्यामधीलच एक भाग म्हणजे या थेट सर पंचांना काम करण्यास मोकळीक मिळावी म्हणून दोन वर्ष  अविश्‍वास प्रस्तावाला समोरे जावे लगणार नाही.विद्यमान अधिनियमाच्या तरतुदीनुसार पंचायतीमध्ये निवडून  आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केल्या जाते.  सदस्यांच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश सदस्य सं ख्येपेक्षा कमी नसतील एवढय़ा सदस्यांना अविश्‍वास प्रस्ताव  मांडता येतो. वारंवार मांडल्या जाणार्‍या अविश्‍वास प्रस्तावामुळे सरपंचाच्या  कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे निवडून आलेल्या सर पंचांना आपले काम अतिशय प्रभावीपणे करता यावे  यासाठीच दोन वर्ष अविश्‍वास प्रस्ताव आणता येणार नाही,  असे बंधन घालून प्रचलीत पद्धतीमध्ये बदल करण्यात  आल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.थेट सरपंचाला काही विशेषाधिकार देण्यात आले आहे.  यामध्ये ग्रामपंचायतीच्या सभांच्या कार्यसूचीला अंतिम रूप  देणे, तीन किंवा जास्त सदस्यांची मागणी असल्यास ती बाब  पुढच्या सभेच्या कार्यसूचीत समाविष्ट करणे, पंचायतींच्या  सर्व ग्रामसभांचा व ग्रामविकास समित्यांच्या अध्यक्षस्थानी  सरपंचच राहणार आहे. 

अर्थसंकल्प तयार करावा लागेल! ग्रामपंचायतीच्या वार्षिक आराखडा तयार करण्याचे काम सर पंचांना करावे लगाणार आहे. सरपंच ५ जानेवारीपूर्वी निधी तील प्रारंभिक शिल्लक व पुढील वित्तीय वर्षासाठी पंचायतींची  अंदाजित प्राप्ती विवरण सादर करेल. पंचायत ३१ जानेवारीपूर्वी विवरणाच्या शिफारसीला अंतिम  स्वरूप देईल. २८ फेब्रुवारीपूर्वी ग्रामसभेच्या अनुसर्मथनार्थ  ठेवण्यात येणार आहे. पंचायत समितीद्वारा ३१ मार्चपूर्वी विवरणास मान्यता देणार  आहे. गावाच्या विकासासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची  जबाबदारी सरपंच्याकडेच राहणार आहे. 

अविश्‍वास प्रस्तावाला ग्रामसभेची हवी मंजुरी!थेट सरपंच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव जर ग्रामपंचायतीच्या  तीन चतुर्थांस सदस्यांनी संमत केला असला तरी  जिल्हाधिकार्‍यांनी या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या  अधिकार्‍यांच्या समक्ष व त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष  ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाद्वारे याला मंजुरी दिली पाहिजे.  तरच सरपंच त्यांचे कार्य थांबवतील व अधिकार, कार्ये व  कर्तव्ये उपसरपंच्याकडे सुपूर्द करतील, असा मोठा बदल  ग्रामविकास विभागाने केला आहे.