शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शेतक-यांना मातीचा टिळा लावून जलपूजन!

By admin | Updated: March 19, 2016 01:56 IST

गांधीग्राम ते नेरधामणा जलदिंडीत शेकडो शेतकरी, विद्यार्थ्यांचा सहभाग; कीर्तनातून जलप्रबोधन.

अकोला: पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्हय़ात १६ ते २२ मार्चपर्यंत एक आठवडा जलजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त जलजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाण्याचे संवर्धन करणे कसे महत्त्वाचे आहे, यासाठीचे प्रबोधन कीर्तन, कविता, कथा, कथनातून अर्थात मनोरंजनातून शेतकरी, नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. माथा ते पायथा, मूलस्थानी जलसंधारण करणे काळाची गरज असल्याचे शेतकर्‍यांना समजावून सांगितले जात आहे. शुक्रवारी गांधीग्राम ते नेरधामणापर्यंत (बॅरेज) १0 किलोमीटर जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. गांधीग्राम येथे एका कार्यक्रमाद्वारे जलदिंडीला प्रारंभ झाला. यावेळी कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांनी पाण्याचे महत्त्व विशद केले. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी जलजागृती अभियानामागील पार्श्‍वभूमी सांगून शेतकरी, नागरिकांना जल संवर्धनासाठीचे आवाहन केले. पाणी वापर संस्था प्रकल्प समितीचे अध्यक्ष मनोज तायडे यांनी ह्यजल है तो कल हैह्ण या विषयावर शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. भाई प्रदीप देशमुख यांनी याबाबत आपले मत मांडले. या प्रसंगी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक यावेळी दिंडीत सहभागी झाले. गोपाला गोपाला जल वाचवा, माती वाचवाचा गजर करीत जलदिंडी नैराट वैराट, राजापूर आदी गावातून धामणा येथे पोहोचली. प्रारंभी येथे शेतकर्‍यांना मातीचा टिळा लावून त्यांचे व जल कलशाचे पूजन करण्यात आले. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात शेतकर्‍यांचे कीर्तनाद्वारे प्रबोधन करण्यात आले. अंधश्रद्धेवर प्रहार करीत भुईभार यांनी पाण्याचे महत्त्व कीर्तनातून मांडले.