शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

शेतक-यांना मातीचा टिळा लावून जलपूजन!

By admin | Updated: March 19, 2016 01:56 IST

गांधीग्राम ते नेरधामणा जलदिंडीत शेकडो शेतकरी, विद्यार्थ्यांचा सहभाग; कीर्तनातून जलप्रबोधन.

अकोला: पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्हय़ात १६ ते २२ मार्चपर्यंत एक आठवडा जलजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त जलजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाण्याचे संवर्धन करणे कसे महत्त्वाचे आहे, यासाठीचे प्रबोधन कीर्तन, कविता, कथा, कथनातून अर्थात मनोरंजनातून शेतकरी, नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. माथा ते पायथा, मूलस्थानी जलसंधारण करणे काळाची गरज असल्याचे शेतकर्‍यांना समजावून सांगितले जात आहे. शुक्रवारी गांधीग्राम ते नेरधामणापर्यंत (बॅरेज) १0 किलोमीटर जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. गांधीग्राम येथे एका कार्यक्रमाद्वारे जलदिंडीला प्रारंभ झाला. यावेळी कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांनी पाण्याचे महत्त्व विशद केले. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी जलजागृती अभियानामागील पार्श्‍वभूमी सांगून शेतकरी, नागरिकांना जल संवर्धनासाठीचे आवाहन केले. पाणी वापर संस्था प्रकल्प समितीचे अध्यक्ष मनोज तायडे यांनी ह्यजल है तो कल हैह्ण या विषयावर शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. भाई प्रदीप देशमुख यांनी याबाबत आपले मत मांडले. या प्रसंगी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक यावेळी दिंडीत सहभागी झाले. गोपाला गोपाला जल वाचवा, माती वाचवाचा गजर करीत जलदिंडी नैराट वैराट, राजापूर आदी गावातून धामणा येथे पोहोचली. प्रारंभी येथे शेतकर्‍यांना मातीचा टिळा लावून त्यांचे व जल कलशाचे पूजन करण्यात आले. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात शेतकर्‍यांचे कीर्तनाद्वारे प्रबोधन करण्यात आले. अंधश्रद्धेवर प्रहार करीत भुईभार यांनी पाण्याचे महत्त्व कीर्तनातून मांडले.