शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

संत रविदास महाराज जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

------------------------- भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात! कोरोनाचा फटका: आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाल गुरांना टाकण्याची वेळ दानापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ...

-------------------------

भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात!

कोरोनाचा फटका: आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाल गुरांना टाकण्याची वेळ

दानापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले. परिणामी, भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. भाजीपाला विक्री केली जात नसल्याने गुरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे भाजीपाला लागवडीचा खर्च निघणे कठीण झाले आहे.

तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. शिवारात पाण्याची सुविधा असल्याने शेतकरी बारामाही भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. गत वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला, तसेच निसर्गाच्या अवकृपेने खरीप हंगामातही शेतकऱ्यांचा लागवडी खर्च वसूल झाला नाही. त्यानंतर, अनलॉक प्रक्रियेत सर्व सुरू झाल्यानंतर जनजीवन रुळावर येत होते. मात्र, गत काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पैशांची जुळवाजुळव एकरी ५०,००० हजार रुपये खर्च करून टोमॅटो, वांगी, मिरची व इतर भाजीपाला पिकाची पेरणी केली आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद केल्याने भाजीपाल्याची विक्री कुठे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परिणामी, शेतकरी गुरांना भाजीपाला टाकीत असल्याचे चित्र आहे.

-----------------------------------------------------

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सद्यस्थितीत टोमॅटो ५० रुपये कॅरेटने विक्री होत आहे, तसेच आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला विक्री कुठे करावी, असा प्रश्न आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात आहेत.

विलास बाबाराव खवले, शेतकरी, दानापूर