शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

उद्योगांना संजीवनी; कुं भारी तलावातील विहिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:05 IST

उन्हाळय़ाहूनही बिकट परिस्थिती निर्माण झालेली  असल्याने अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग बंद  पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खांबोरा पाठोपाठ आता कुंभारीचा पाणीपुरवठाही काही दिवसांतच  संपुष्टात येणार आहे. त्यानंतर उद्योगांना पाणी तरी कोठून  द्यायचे, याचा शोध आता एमआयडीसीचे अधिकारी घेत  आहेत. कुंभारी तलावातील विहिरी यापुढे संजीवनी देऊ  शकतात, त्या दिशेने आता एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी  चाचपणी सुरू केली आहे. 

ठळक मुद्देअकोला एमआयडीसी अधिकार्‍यांकडून पाहणी सुरू कुंभारी तलावातील विहिरीतून घेणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उन्हाळय़ाहूनही बिकट परिस्थिती निर्माण झालेली  असल्याने अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग बंद  पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खांबोरा पाठोपाठ आता कुंभारीचा पाणीपुरवठाही काही दिवसांतच  संपुष्टात येणार आहे. त्यानंतर उद्योगांना पाणी तरी कोठून  द्यायचे, याचा शोध आता एमआयडीसीचे अधिकारी घेत  आहेत. कुंभारी तलावातील विहिरी यापुढे संजीवनी देऊ  शकतात, त्या दिशेने आता एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी  चाचपणी सुरू केली आहे.        महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या  वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणीपुरवठा करणार्‍या  खांबोरा प्रकल्पाने पाणी देणे बंद केले. त्यामुळे सप्टेंबरपासून  एमआयडीसीने कुंभारीच्या तलावातून पाणीपुरवठा सुरू  केला; मात्र कुंभारी तलावातील पाणीदेखील पुरेसे नाही.  पावसाची कृपा झाली नाही, तर ऑक्टोबरमध्ये उद्योगांना  पाणी पुरविणे अशक्य होईल. त्यामुळे अकोल्यातील  उद्योजक आणि एमआयडीसी अधिकारी चिंतातुर झाले  आहेत. एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी पर्याच म्हणून  परिसरातील चार विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव  जिल्हाधिकार्‍यांपुढे ठेवला आहे.  औद्योगिक वसाहतीमधील ८९0 उद्योगांना कधीकाळी  कुंभारी तलावातूनच पाणीपुरवठा व्हायचा. कुंभारीचा तलाव  आजपर्यंंंत कोरडा पडल्याचे कुणाला आठवत नाही; मात्र  यंदा पाऊस नसल्याने कुंभारी तलावाची पातळी वाढू शकली  नाही. गोरव्हा, कातखेडा, येवता, एरंडा-परंडा परिसरात  पाऊस झाला, तर लोणारमेघ नाल्यातून पाण्याचा लोंढा  कुंभारी तलावात येतो. त्यामुळे या तलावातील पाणी शक्य तोवर आटत नाही.जवळपास शंभर एकरच्या विस्तीर्ण  क्षेत्रफळात तलाव व्यापला आहे. कुंभारी ते येवतापर्यंंंत स् पर्शलेल्या या तलावात कधीकाळी लहान-मोठय़ा सहा  विहिरी होत्या. त्या आता या तलावात दिसत नाहीत. तलाव  कोरडा पडल्यास त्यातील सहाही विहिरींचा उपसा करून  त्यातील गाळ काढल्यास पुन्हा झरे येथे येऊ शकतात, असे  गावकर्‍यांचे मत आहे. जर भविष्यात पाणीटंचाई निर्माण  झाली, तर या विहिरी कायम पाणी देत राहतील. कारण  कुंभारी परिसरातील पाण्याची पातळी अजूनही खालावलेली  नाही. आता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय आणि  एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल बन्सोड या प्रकरणी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांंंचे लक्ष लागून आहे.

आजपर्यंंंत कुंभारीचा तलाव कोरडा पडलेला पाहिला नाही.  कुंभारीत कधीच पाणीटंचाई झाली नाही. उन्हाळ्यातही येथे  पाणी समस्या कधी आली नाही. त्यामुळे कुंभारी तलावातील  विहिरी उपसून त्याचा उपयोग केला गेला पाहिजे.-सिंकदर शहा, रा. कुंभारी.