शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

उद्योगांना संजीवनी; कुं भारी तलावातील विहिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:05 IST

उन्हाळय़ाहूनही बिकट परिस्थिती निर्माण झालेली  असल्याने अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग बंद  पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खांबोरा पाठोपाठ आता कुंभारीचा पाणीपुरवठाही काही दिवसांतच  संपुष्टात येणार आहे. त्यानंतर उद्योगांना पाणी तरी कोठून  द्यायचे, याचा शोध आता एमआयडीसीचे अधिकारी घेत  आहेत. कुंभारी तलावातील विहिरी यापुढे संजीवनी देऊ  शकतात, त्या दिशेने आता एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी  चाचपणी सुरू केली आहे. 

ठळक मुद्देअकोला एमआयडीसी अधिकार्‍यांकडून पाहणी सुरू कुंभारी तलावातील विहिरीतून घेणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उन्हाळय़ाहूनही बिकट परिस्थिती निर्माण झालेली  असल्याने अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग बंद  पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खांबोरा पाठोपाठ आता कुंभारीचा पाणीपुरवठाही काही दिवसांतच  संपुष्टात येणार आहे. त्यानंतर उद्योगांना पाणी तरी कोठून  द्यायचे, याचा शोध आता एमआयडीसीचे अधिकारी घेत  आहेत. कुंभारी तलावातील विहिरी यापुढे संजीवनी देऊ  शकतात, त्या दिशेने आता एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी  चाचपणी सुरू केली आहे.        महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या  वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणीपुरवठा करणार्‍या  खांबोरा प्रकल्पाने पाणी देणे बंद केले. त्यामुळे सप्टेंबरपासून  एमआयडीसीने कुंभारीच्या तलावातून पाणीपुरवठा सुरू  केला; मात्र कुंभारी तलावातील पाणीदेखील पुरेसे नाही.  पावसाची कृपा झाली नाही, तर ऑक्टोबरमध्ये उद्योगांना  पाणी पुरविणे अशक्य होईल. त्यामुळे अकोल्यातील  उद्योजक आणि एमआयडीसी अधिकारी चिंतातुर झाले  आहेत. एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी पर्याच म्हणून  परिसरातील चार विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव  जिल्हाधिकार्‍यांपुढे ठेवला आहे.  औद्योगिक वसाहतीमधील ८९0 उद्योगांना कधीकाळी  कुंभारी तलावातूनच पाणीपुरवठा व्हायचा. कुंभारीचा तलाव  आजपर्यंंंत कोरडा पडल्याचे कुणाला आठवत नाही; मात्र  यंदा पाऊस नसल्याने कुंभारी तलावाची पातळी वाढू शकली  नाही. गोरव्हा, कातखेडा, येवता, एरंडा-परंडा परिसरात  पाऊस झाला, तर लोणारमेघ नाल्यातून पाण्याचा लोंढा  कुंभारी तलावात येतो. त्यामुळे या तलावातील पाणी शक्य तोवर आटत नाही.जवळपास शंभर एकरच्या विस्तीर्ण  क्षेत्रफळात तलाव व्यापला आहे. कुंभारी ते येवतापर्यंंंत स् पर्शलेल्या या तलावात कधीकाळी लहान-मोठय़ा सहा  विहिरी होत्या. त्या आता या तलावात दिसत नाहीत. तलाव  कोरडा पडल्यास त्यातील सहाही विहिरींचा उपसा करून  त्यातील गाळ काढल्यास पुन्हा झरे येथे येऊ शकतात, असे  गावकर्‍यांचे मत आहे. जर भविष्यात पाणीटंचाई निर्माण  झाली, तर या विहिरी कायम पाणी देत राहतील. कारण  कुंभारी परिसरातील पाण्याची पातळी अजूनही खालावलेली  नाही. आता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय आणि  एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल बन्सोड या प्रकरणी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांंंचे लक्ष लागून आहे.

आजपर्यंंंत कुंभारीचा तलाव कोरडा पडलेला पाहिला नाही.  कुंभारीत कधीच पाणीटंचाई झाली नाही. उन्हाळ्यातही येथे  पाणी समस्या कधी आली नाही. त्यामुळे कुंभारी तलावातील  विहिरी उपसून त्याचा उपयोग केला गेला पाहिजे.-सिंकदर शहा, रा. कुंभारी.