शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

उद्योगांना संजीवनी; कुं भारी तलावातील विहिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:05 IST

उन्हाळय़ाहूनही बिकट परिस्थिती निर्माण झालेली  असल्याने अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग बंद  पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खांबोरा पाठोपाठ आता कुंभारीचा पाणीपुरवठाही काही दिवसांतच  संपुष्टात येणार आहे. त्यानंतर उद्योगांना पाणी तरी कोठून  द्यायचे, याचा शोध आता एमआयडीसीचे अधिकारी घेत  आहेत. कुंभारी तलावातील विहिरी यापुढे संजीवनी देऊ  शकतात, त्या दिशेने आता एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी  चाचपणी सुरू केली आहे. 

ठळक मुद्देअकोला एमआयडीसी अधिकार्‍यांकडून पाहणी सुरू कुंभारी तलावातील विहिरीतून घेणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उन्हाळय़ाहूनही बिकट परिस्थिती निर्माण झालेली  असल्याने अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग बंद  पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खांबोरा पाठोपाठ आता कुंभारीचा पाणीपुरवठाही काही दिवसांतच  संपुष्टात येणार आहे. त्यानंतर उद्योगांना पाणी तरी कोठून  द्यायचे, याचा शोध आता एमआयडीसीचे अधिकारी घेत  आहेत. कुंभारी तलावातील विहिरी यापुढे संजीवनी देऊ  शकतात, त्या दिशेने आता एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी  चाचपणी सुरू केली आहे.        महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या  वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणीपुरवठा करणार्‍या  खांबोरा प्रकल्पाने पाणी देणे बंद केले. त्यामुळे सप्टेंबरपासून  एमआयडीसीने कुंभारीच्या तलावातून पाणीपुरवठा सुरू  केला; मात्र कुंभारी तलावातील पाणीदेखील पुरेसे नाही.  पावसाची कृपा झाली नाही, तर ऑक्टोबरमध्ये उद्योगांना  पाणी पुरविणे अशक्य होईल. त्यामुळे अकोल्यातील  उद्योजक आणि एमआयडीसी अधिकारी चिंतातुर झाले  आहेत. एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी पर्याच म्हणून  परिसरातील चार विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव  जिल्हाधिकार्‍यांपुढे ठेवला आहे.  औद्योगिक वसाहतीमधील ८९0 उद्योगांना कधीकाळी  कुंभारी तलावातूनच पाणीपुरवठा व्हायचा. कुंभारीचा तलाव  आजपर्यंंंत कोरडा पडल्याचे कुणाला आठवत नाही; मात्र  यंदा पाऊस नसल्याने कुंभारी तलावाची पातळी वाढू शकली  नाही. गोरव्हा, कातखेडा, येवता, एरंडा-परंडा परिसरात  पाऊस झाला, तर लोणारमेघ नाल्यातून पाण्याचा लोंढा  कुंभारी तलावात येतो. त्यामुळे या तलावातील पाणी शक्य तोवर आटत नाही.जवळपास शंभर एकरच्या विस्तीर्ण  क्षेत्रफळात तलाव व्यापला आहे. कुंभारी ते येवतापर्यंंंत स् पर्शलेल्या या तलावात कधीकाळी लहान-मोठय़ा सहा  विहिरी होत्या. त्या आता या तलावात दिसत नाहीत. तलाव  कोरडा पडल्यास त्यातील सहाही विहिरींचा उपसा करून  त्यातील गाळ काढल्यास पुन्हा झरे येथे येऊ शकतात, असे  गावकर्‍यांचे मत आहे. जर भविष्यात पाणीटंचाई निर्माण  झाली, तर या विहिरी कायम पाणी देत राहतील. कारण  कुंभारी परिसरातील पाण्याची पातळी अजूनही खालावलेली  नाही. आता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय आणि  एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल बन्सोड या प्रकरणी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांंंचे लक्ष लागून आहे.

आजपर्यंंंत कुंभारीचा तलाव कोरडा पडलेला पाहिला नाही.  कुंभारीत कधीच पाणीटंचाई झाली नाही. उन्हाळ्यातही येथे  पाणी समस्या कधी आली नाही. त्यामुळे कुंभारी तलावातील  विहिरी उपसून त्याचा उपयोग केला गेला पाहिजे.-सिंकदर शहा, रा. कुंभारी.