शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

मोर्णेतील जलकुंभी ठरू शकते संजीवनी!

By admin | Updated: December 13, 2014 00:42 IST

जलकुंभी काढण्यासाठी व्यापक पुढाकाराची गरज.

डॉ. किरण वाघमारे / अकोलाशहरातील मोर्णा नदीच्या प्रवाहात सर्वात मोठा अडथळा बनली आहे, ती या नदीतील जलकुंभी. या जलकुंभीचा नायनाट करणे अतिशय कठीण बनले आहे. दरवर्षी लाखो रुपये यावर खर्च केले जातात; परंतु परिस्थिती जैसे थे आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापूरच्या धर्तीवर जर जलकुंभीचा उपयोग खत म्हणून केला गेला तर जलकुंभी शेतकर्‍यांसाठी संजीवनी बनू शकते; परंतु यासाठी व्यापक पुढाकार घेण्याची गरज आहे. वाशिम जिल्ह्यातून उगम पावणार्‍या मोर्णा नदीला प्रदूषणाची लागण होते ती कौलखेडनंतर. कौलखेडच्या पुढे थेट पोलिस प्रशिक्षण केंद्रापर्यंत मोर्णा नदी दूषित झालेली दिसते. मोर्णेकडे नजर टाकली तर असे लक्षात येते की, मोठय़ा प्रमाणात जलकुंभी उगवली आहे. त्यामुळे मोर्णेचे पाणी वाहताना दिसत नाही. जलकुंभीने नदीला व्यापून टाकले आहे. दरवर्षी महापालिकेच्यावतीने जवळपास ५ लाख रुपये जलकुंभीच्या निर्मूलनावर खर्च करण्यात येतो; परंतु त्याचा उपयोग झालेला दिसत नाही. उलट दिवसेंदिवस जलकुंभी अधिकच फोफावत चालली आहे. या वनस्पतीमुळे नदीतील जलचर प्राणी नष्ट झाले आहेत आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा त्रास अकोलेकरांना चांगलाच जाणवू लागला आहे. जलकुंभीने पिण्यायोग्य पाणी प्रदूषित केले आहे. जलकुंभी पाण्यात असणे घातक आहे. मात्र, पाण्यातून बाहेर काढल्यानंतर ती शेतकर्‍यांसाठी संजीवनी बनू शकते. जलकुंभी पाण्यातून काढल्यानंतर ती गावाच्या बाहेर एका मोठय़ा खड्डय़ात मातीसह पाच थरात टाकली की, ८ महिन्यानंतर त्याचे चांगले खत तयार होते. हे खत ऊस, गहू, ज्वारी, कापूस या सर्वच पिकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कोल्हापूर महापालिकेलेने रंकाळा तलावातील जलकुंभी काढून तिचा खत म्हणून उपयोग सुरू केला आहे. त्याचे चांगले परिणामदेखील तिथे दिसू लागले आहेत. जलकुंभी काढल्यामुळे पाणी मोकळे होऊन वाहू लागते, परिणामी जलचर प्राण्यांची उत्पत्ती वाढून निसर्गचक्र संतुलित होऊ शकते. सोबतच जलकुंभीचा उपयोग खत म्हणून शेतकर्‍यांना मोफत उपलब्ध होऊ शकते. महागडी खते घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी जलकुंभी वरदान ठरू शकते. यासाठी महापालिका प्रशासनाने व्यापक विचार करण्याची गरज आहे.