शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यावे!

By admin | Updated: November 7, 2014 00:44 IST

लोकमतच्या परिचर्चेत पदाधिकारी-अधिकार्‍यांमध्ये उमटला सूर

अकोला : स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी आहे, त्यामुळे स्वच्छता अभियानाबाबत व्या पक जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याची गरज असून, स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे, असा सूर गुरुवारी लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकार्‍यांमध्ये उमटला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्र शासनामार्फत देशभरात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने लोकमत कार्यालयात स्वच्छता अभियानाची अंमलबजावणीह्ण या विषयावर आयोजित परिचर्चेला उपमहापौर विनोद मापारी, निवासी उ पजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार राजेश जाधव, जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान कक्षाचे संवाद सल्लागार राजेश डहाके, सांगवी मोहाडीचे उपसरपंच दिनकर वाघ, मनपा स्वच्छता विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी सुरेश पुंड उपस्थित होते. अकोला शहरात कचर्‍याची विल्हेवाट आणि स्वच्छतेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती उपस्थित मनपा पदाधिकारी व अधिकार्‍यांनी दिली. तसेच स्वच्छता अभियानाच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात करावयाच्या उपाययोजना आणि करण्यात आलेले नियोजन यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी यावेळी विचार मांडले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी तसेच प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्यातून स्वच्छता अभियानाची अंमलबजवणी करण्यात येत आहे. स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेतून जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात येणार असून, जागृती आणि प्रत्यक्ष कृ तीवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमेतील सातत्य टिकवून ठेवण्याची गरज असून, या अभियानात प्रत्येकाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. सामूहिक प्रयत्नातून आणि सहकार्यातून स्वच्छता अभियान यशस्वी होणार आहे, त्यासाठी स्वच्छता अभियानाला जिल्ह्यात लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी बोलून दाखविली.