शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यावे!

By admin | Updated: November 7, 2014 00:44 IST

लोकमतच्या परिचर्चेत पदाधिकारी-अधिकार्‍यांमध्ये उमटला सूर

अकोला : स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी आहे, त्यामुळे स्वच्छता अभियानाबाबत व्या पक जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याची गरज असून, स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे, असा सूर गुरुवारी लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकार्‍यांमध्ये उमटला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्र शासनामार्फत देशभरात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने लोकमत कार्यालयात स्वच्छता अभियानाची अंमलबजावणीह्ण या विषयावर आयोजित परिचर्चेला उपमहापौर विनोद मापारी, निवासी उ पजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार राजेश जाधव, जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान कक्षाचे संवाद सल्लागार राजेश डहाके, सांगवी मोहाडीचे उपसरपंच दिनकर वाघ, मनपा स्वच्छता विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी सुरेश पुंड उपस्थित होते. अकोला शहरात कचर्‍याची विल्हेवाट आणि स्वच्छतेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती उपस्थित मनपा पदाधिकारी व अधिकार्‍यांनी दिली. तसेच स्वच्छता अभियानाच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात करावयाच्या उपाययोजना आणि करण्यात आलेले नियोजन यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी यावेळी विचार मांडले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी तसेच प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्यातून स्वच्छता अभियानाची अंमलबजवणी करण्यात येत आहे. स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेतून जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात येणार असून, जागृती आणि प्रत्यक्ष कृ तीवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमेतील सातत्य टिकवून ठेवण्याची गरज असून, या अभियानात प्रत्येकाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. सामूहिक प्रयत्नातून आणि सहकार्यातून स्वच्छता अभियान यशस्वी होणार आहे, त्यासाठी स्वच्छता अभियानाला जिल्ह्यात लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी बोलून दाखविली.