शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

शहरासाठी मंजूर २४ दलघमी पाण्याचे आरक्षण हाेणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:19 IST

अकाेला : तत्कालीन सरकारने अकाेलेकरांसाठी वान धरणातून २४ दलघमी पाणी आरक्षित केले हाेते. मध्यंतरी वान धरणातून बाळापूर मतदारसंघात समाविष्ट ...

अकाेला : तत्कालीन सरकारने अकाेलेकरांसाठी वान धरणातून २४ दलघमी पाणी आरक्षित केले हाेते. मध्यंतरी वान धरणातून बाळापूर मतदारसंघात समाविष्ट खारपाणपट्ट्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा याेजनेसाठी ३.३५ दलघमी पाणी आरक्षणावरून चांगलेच राजकारण तापल्याचे दिसून आले. यादरम्यान, वर्तमानस्थितीत अकाेला शहराला इतक्या माेठ्या प्रमाणात पाण्याची गरज नसल्यामुळे तत्कालीन शासनाने स्थगिती दिलेले २४ दलघमी पाणी आरक्षण पूर्णत: रद्द करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्याची माहिती आहे.

केंद्र शासनाच्या ‘अमृत’याेजनेअंतर्गत अकाेला शहरात नवीन जलवाहिनीचे जाळे टाकणे, आठ जलकुंभांची उभारणी करणे आदी कामे प्रगतिपथावर आहेत. आजराेजी अकाेलेकरांना महान धरणातून पाणीपुरवठा केला जात असून, त्यासाठी पाटबंधारे विभागाकडे २४ दलघमीचे आरक्षण निश्चित केले आहे. पाण्याचे याेग्यरीत्या नियाेजन केल्यास शहरवासीयांना वर्षभर किमान एक दिवसआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे. परंतु मनपाच्या नियाेजनशून्य कारभारामुळे व जलप्रदाय विभागाच्या खाबुगिरीमुळे नागरिकांना चाैथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाताे. दरम्यान, शहराची भविष्यातील वाढती लाेकसंख्या ध्यानात ठेवून ‘अमृत’ याेजने अंतर्गत तत्कालीन युती सरकारच्या कालावधीत वान धरणातून आणखी २४ दलघमी पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले हाेते. यासाठी भाजपच्या स्थानिक लाेकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला हाेता. ऑक्टाेबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अकाेला शहरासाठी मंजूर २४ दलघमी पाणी आरक्षणाला कडाडून विराेध दर्शविला. निवडणुकीच्या ताेंडावर शेतकऱ्यांचा विराेध लक्षात घेता तत्कालीन शासनाने अकाेलेकरांच्या पाणी आरक्षणाला स्थगिती दिली हाेती, हे येथे उल्लेखनीय.

सबमर्सिबल, हातपंपांची संख्या भाेवणार

काेट्यवधींची देयके लाटण्यासाठी जलप्रदाय विभागामार्फत आजी- माजी पदाधिकारी दरवर्षी सबमर्सिबल, हातपंपांची शिफारस करतात. मागील पंधरा वर्षांच्या कालावधीत ही संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून, महान धरणातून पाण्याचा एक थेंबही उचल न करता मनपाने खाेदलेल्या सबमर्सिबल, हातपंपांच्या माध्यमातून शहरवासीयांना पाणीपुरवठा हाेऊ शकताे, अशा स्वरूपाची माहिती शासनाकडे आहे.

...तर तेल्हारावासीयांना दिलासा

भाजपचे ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अकाेला शहरासाठी मंजूर २४ दलघमी पाणी आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा विधानसभा निवडणुकीपूर्वी रेटून धरला हाेता. तत्कालीन शासनाने स्थगिती दिल्यानंतर आता आघाडी सरकारकडून आरक्षण रद्द केल्या जाणार आहे. तसे झाल्यास हा तेल्हारावासीयांसाठी माेठा दिलासा मानला जाईल.