शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
7
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
8
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
9
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
10
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
11
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
12
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
13
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
14
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
15
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
16
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
17
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
18
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
19
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
20
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान

शहरासाठी मंजूर २४ दलघमी पाण्याचे आरक्षण हाेणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:19 IST

अकाेला : तत्कालीन सरकारने अकाेलेकरांसाठी वान धरणातून २४ दलघमी पाणी आरक्षित केले हाेते. मध्यंतरी वान धरणातून बाळापूर मतदारसंघात समाविष्ट ...

अकाेला : तत्कालीन सरकारने अकाेलेकरांसाठी वान धरणातून २४ दलघमी पाणी आरक्षित केले हाेते. मध्यंतरी वान धरणातून बाळापूर मतदारसंघात समाविष्ट खारपाणपट्ट्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा याेजनेसाठी ३.३५ दलघमी पाणी आरक्षणावरून चांगलेच राजकारण तापल्याचे दिसून आले. यादरम्यान, वर्तमानस्थितीत अकाेला शहराला इतक्या माेठ्या प्रमाणात पाण्याची गरज नसल्यामुळे तत्कालीन शासनाने स्थगिती दिलेले २४ दलघमी पाणी आरक्षण पूर्णत: रद्द करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्याची माहिती आहे.

केंद्र शासनाच्या ‘अमृत’याेजनेअंतर्गत अकाेला शहरात नवीन जलवाहिनीचे जाळे टाकणे, आठ जलकुंभांची उभारणी करणे आदी कामे प्रगतिपथावर आहेत. आजराेजी अकाेलेकरांना महान धरणातून पाणीपुरवठा केला जात असून, त्यासाठी पाटबंधारे विभागाकडे २४ दलघमीचे आरक्षण निश्चित केले आहे. पाण्याचे याेग्यरीत्या नियाेजन केल्यास शहरवासीयांना वर्षभर किमान एक दिवसआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे. परंतु मनपाच्या नियाेजनशून्य कारभारामुळे व जलप्रदाय विभागाच्या खाबुगिरीमुळे नागरिकांना चाैथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाताे. दरम्यान, शहराची भविष्यातील वाढती लाेकसंख्या ध्यानात ठेवून ‘अमृत’ याेजने अंतर्गत तत्कालीन युती सरकारच्या कालावधीत वान धरणातून आणखी २४ दलघमी पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले हाेते. यासाठी भाजपच्या स्थानिक लाेकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला हाेता. ऑक्टाेबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अकाेला शहरासाठी मंजूर २४ दलघमी पाणी आरक्षणाला कडाडून विराेध दर्शविला. निवडणुकीच्या ताेंडावर शेतकऱ्यांचा विराेध लक्षात घेता तत्कालीन शासनाने अकाेलेकरांच्या पाणी आरक्षणाला स्थगिती दिली हाेती, हे येथे उल्लेखनीय.

सबमर्सिबल, हातपंपांची संख्या भाेवणार

काेट्यवधींची देयके लाटण्यासाठी जलप्रदाय विभागामार्फत आजी- माजी पदाधिकारी दरवर्षी सबमर्सिबल, हातपंपांची शिफारस करतात. मागील पंधरा वर्षांच्या कालावधीत ही संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून, महान धरणातून पाण्याचा एक थेंबही उचल न करता मनपाने खाेदलेल्या सबमर्सिबल, हातपंपांच्या माध्यमातून शहरवासीयांना पाणीपुरवठा हाेऊ शकताे, अशा स्वरूपाची माहिती शासनाकडे आहे.

...तर तेल्हारावासीयांना दिलासा

भाजपचे ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अकाेला शहरासाठी मंजूर २४ दलघमी पाणी आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा विधानसभा निवडणुकीपूर्वी रेटून धरला हाेता. तत्कालीन शासनाने स्थगिती दिल्यानंतर आता आघाडी सरकारकडून आरक्षण रद्द केल्या जाणार आहे. तसे झाल्यास हा तेल्हारावासीयांसाठी माेठा दिलासा मानला जाईल.